शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

हा तर बिल्डरनिर्मित महापूर!

By admin | Updated: August 22, 2014 00:49 IST

जनजीवन अस्ताव्यस्त : इंच-इंच जमिनीसाठी ‘ओढा’ताण; नैसर्गिक प्रवाह वळविल्यानेच जलतांडव

राजीव मुळ्ये - सातारा --कुणी घरातून पाणी बाहेर काढतो आहे, तर कुणी दुकानातून चिखल साफ करतो आहे. कुणाचं फर्निचर पाण्यानं फुगलंय, तर कुणाला प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या चीजवस्तू मोडलेल्या-तुटलेल्या स्थितीत उघड्या डोळ्यांनी पाहाव्या लागतायत. साताऱ्यात बुधवारी तासभर झालेल्या जलतांडवानंतर गुरुवारचा दिवस एकच यक्षप्रश्न घेऊनच उगवला. हा बिल्डरनिर्मित महापूर पुन्हा आला तर...? होय, ‘बिल्डरनिर्मित’च! पाऊण तासात ८२ मिलीमीटर पाऊस शहराळलेल्या नागरिकांसाठी नवा असेल; पण निसर्गासाठी तो नवा नाही. जुन्या काळातल्या सातारकरांना विचाराल तर त्यांनाही तो सवयीचाच! बुधवारी कुठेही जीवितहानी झाली नाही हे सुदैव; पण वित्तहानीनं हाहाकार उडालाय. जागोजागी कमरेपेक्षा जास्त पाणी साचलंच कसं? ते वाहून का गेलं नाही? या प्रश्नांची उत्तरं नगरपालिका आणि इंच-इंच जमिनीसाठी ‘ओढा’ताण करणाऱ्या बिल्डरांनी तसेच नागरिकांनी प्रामाणिकपणे शोधली नाहीत, तर हे जलतांडव वारंवार पाहायला मिळेल, असे स्पष्ट संकेत ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून मिळत आहेत. डोंगरउतारावर वसलेल्या या शहरात नगरविकास विभागाने जी दक्षता घ्यायला पाहिजे, बांधकामांवर जी बारीक नजर ठेवली पाहिजे, तिच्या अभावामुळंच या संकटाला आमंत्रण मिळालंय. डोंगरावरून वाहत येणारे बहुसंख्य ओढे शहरातून प्रवास करतात. या ओढ्यांची रुंदी कमी होत-होत आता त्यांची अरुंद गटारं झाली आहेत. ८२ मिलीमीटर पाऊस या ओढ्यांना झेपला नाही आणि पाणी इतस्तत: पसरत गेलं. सखल भागात साचून राहिलं. जिथं अजिबात पाणी येण्याची शक्यता नव्हती, तिथं धो-धो पाणी वाहिलं; तुंबून राहिलं. वाहनं बुडाली; वाहून गेली. काही ठिकाणी माणसं कमरेइतक्या पाण्यात अडकून बसली. काही घरांत मागल्या दारानं पाण्याचा लोंढा शिरला आणि घरातल्या चीजवस्तू घेऊन पुढच्या दारातून पाणी बाहेर पडलं. एके ठिकाणी तर लोंढ्यामुळं पोलादी शटर वाकलं. हे सगळे अनर्थ मानवी चुकांमुळंच झाल्याचं आढळून आलंय.ओढे झालेत गटारांपेक्षाही अरुंद!शहरात अनेक ठिकाणी नैसर्गिक उतारांवरून वाहत येणा़रे ओढे बांधकामांमुळं गटारांपेक्षाही अरुंद बनले आहेत. सातारकरांच्या पूर्वजांनी अत्यंत बुद्धिचातुर्यानं ओढ्यांची पात्रं रुंद ठेवली. काही ओढ्यांवर ब्रिटिशकालीन पूलही आढळतात. परंतु पुलाखालून प्रवास करणारा ओढा मात्र ‘गुप्त’ झालाय. शहराचा आकार एखाद्या तबकासारखा असून, डोंगरावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून येतं. अनेक ठिकाणी या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वळवून जलवाहिनीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न झालाय. सहा फूट रुंदीचे ओढे अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांवर आलेत. काही ठिकाणी भिंती बांधून, जलवाहिन्यांमधून ओढे जातात. नैसर्गिक उतार ज्या दिशेला असेल, त्या दिशेनं पाणी वाहणारच; परंतु उतार विचारात न घेता केवळ ‘सोय’ विचारात घेऊन प्रवाह वळविले आहेत. बुधवारच्या पावसात या प्रवाहांनी वळण घेण्यास विरोध केला आणि ते रस्त्यावर आले. विशेषत: गोडोली भागात आणि अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सर्व पेठांमध्ये ही परिस्थिती पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी ओढ्यातच कॉलम उभे करण्यात आले आहेत. ओढ्याची नैसर्गिक रुंदी दर्शविणारे नकाशेच उपलब्ध नसल्यामुळे ओढ्यालगत बांधकाम करणारे ‘आपलीच जमीन’ समजून आत-आत घुसले आहेत. काही ठिकाणी मधूनच ‘गुप्त’ झालेले ओढे काही अंतरावर पुन्हा प्रकटले आहेत. काही ठिकाणी ओढ्यांवर पुलासारखी स्लॅब टाकून त्यावर इमारती बांधल्याचे दिसून आले आहे. डोंगरावरून वाहून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्यास तो या ‘पुला’खालून जाऊ शकत नाही आणि रस्त्यावर पसरतो. नगररचना विभागाचे यावर काही नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला असून, डोंगरउतारावरील नगराचे नियोजन करताना तज्ज्ञांची मदत न घेतल्याने गंभीर धोके निर्माण झाले आहेत.