शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

‘बीएसएनएल’च्या कारभारामुळे गेला मुलाचा जीव

By admin | Updated: May 30, 2016 00:59 IST

पित्याचा आरोप : बिले दुरुस्तीसाठी घेऊन जाताना अपघात; आता तर कनेक्शनच केले बंद

सातारा : शासकीय कामातील दिरंगाई, मनमानीमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होतो; पण बुध येथील कालेकर कुटुंबाला बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराची मोठी किंमत मोजावी लागली. वारंवार येत असलेली दूरध्वनीची चुकीची बिले दुरुस्त करण्यासाठी पुसेगाव येथे हेलपाटे मारत असतानाच एक दिवस कालेकर यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला. हे कमी काय म्हणून आता तर कालेकर यांचे कनेक्शनही बंद करण्यात आले आहे.बुध, ता. खटाव येथील प्रदीप कालेकर डोळ्यात पाणी आणून सांगत होते... जानेवारी महिन्यांपासून बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराने आमचं कुटुंब त्रस्त आहे. चुकीच्या बिलाच्या दुरुस्तीसाठी माझ्या मुलांना वारंवार बुध-पुसेगाव असे हेलपाटे मारावे लागत होते. यातच मुलाचा जीव गेला. चूक एक-दोनदा होते; पण वारंवार चुका करून आम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप कालेकर यांनी केला. (प्रतिनिधी)आता बारावीच्या निकालाचा काय उपयोग?ओंकार दूरध्वनीचे बिल दुरुस्त करून आणण्यासाठी तो पुसेगावला गेला अन् काळाने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या दुचाकीला झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. बारावी परीक्षेत ओंकार चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला; पण आपला निकाल पाहण्यासाठी ओंकार नव्हता. आता त्या निकालाचा काय उपयोग? बीएसएनएलच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे आम्हाला आमचा मुलगा गमवावा लागल्याचे दु:ख आणि संताप प्रदीप कालेकर यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला.वारंवार येणारी दूरध्वनीची चुकीची बिले, कनेक्शन बंद करणे याबाबत बीएसएनएलच्या सातारा येथील मुख्य कार्यालयात तक्रार केली. मात्र, करू, बघू अशी उत्तरे मिळाली. बिल भरले नाही म्हणून आता आमचे कनेक्शन कट केले आहे. आता पुन्हा हेलपाटे मारायचे का? दुसऱ्या मुलाचा जीव गेल्यानंतर बीएसएनएलचे डोके ठिकाणावर येणार आहे का?- प्रदीप कालेकर, बुध