शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

पायी चालण्याची सवय मोडली; नको त्या वयात गुडघा-कंबरदुखी लागली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सध्या विविध कारणांमुळे अनेकांची चालायची सवय मोडली आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. कोणत्याही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सध्या विविध कारणांमुळे अनेकांची चालायची सवय मोडली आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. कोणत्याही कारणासाठी गाडी वापरण्याची सवय अनेकांना आजार देऊ लागली आहे. त्यामुळे कमी वयात गुडघा आणि कंबरदुखीचा त्रास महिलांसह पुरुषांनाही होऊ लागला आहे. हा त्रास कमी करायचा असेल, तर नियमित चाला, असा सल्ला वैद्यकीयतज्ज्ञ देत आहेत.

हल्ली प्रत्येक घरात एक दुचाकी आणि चारचाकी आहे. मंडईत जाणे असो की किराणा आणणं असो, छोटी गाडी काढली की झालं, ही कुटुंबाची मानसिकता आहे. पायी भाजी आणायला जाणाऱ्यांची संख्याही बोटावर मोजण्याइतकीच आहे. अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर राहायला असणारे सामानाची यादी दुकानदाराला दिल्यानंतर तो माल पिशवी सोडून घेतात. शारीरिक कष्ट करण्याचा आळस हे ही सवय मोडण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे बाकीच्या शारीरिक व्याधी दिवसेंदिवस वाढत आहेत.

चालण्याचा सराव संपुष्टात आल्याने चढाने किती ताकद वापरावी, उताराने किती ऊर्जा वाचवावी, याची गोळाबेरीज करण्याचा सराव चिमुकल्यांना नाही. त्यामुळे ते चढण, उतरण आणि सपाटीवर एकाच ताकदीने चालतात. त्यामुळे थोडे चालणे झाले तरीही त्यांना दम लागतो आणि घरातले मोठे त्यांची काळजी म्हणून चालण्याचे बारकावे शिकविण्यापेक्षा गाडीचा आधार घ्यायला भाग पाडतात.

१) या कारणांसाठीच होतेय चालणे

ज्येष्ठ - व्यायाम म्हणून सकाळ आणि संध्याकाळ

महिला - किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षा मिळेपर्यंत

पुरुष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केली तर शतपावली

तरुणाई - गल्लीतील मित्र-मैत्रिणीच्या घरापर्यंत

२) म्हणून वाढले हाडांचे आजार

नियमित चालण्याची सवय असलेल्या व्यक्तींच्या शरीराची संपूर्ण हालचाल होते. त्यामुळे त्यांना कुठलंही दुखणं उद्भवत नाही. चालणं कमी असल्याने वजन वाढते, त्याबरोबरच कंबर, पाठ आणि गुडघे दुखण्याचाही त्रास होतो. मधुमेह वाढण्याचाही धोका कमी चालण्याने उद्भवतो. वारंवार गाडीचा वापर केल्याने गुडघे, कंबर आणि पाठ यांचे दुखणे बळावते.

- डॉ. शरद जगताप, अस्थिरोगतज्ज्ञ, सातारा

३) हे करून पाहा

एक किलोमीटर परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा

कुठलेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या

घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा

४. यासाठी तरी मुलांना पायी चालवा

रस्त्याने चालत जाताना शारीरिक हालचाल होते. त्याबरोबरच चालत फिरण्याने परिसराची ओळख, महत्त्वपूर्ण खुणा लक्षात राहतात. दुसरं म्हणजे ज्या भागात आपण राहतो तो परिसर, त्यातील गल्लीबोळ माहीत असतील, तर एखाद्या बाका प्रसंगाला सामोरे जाताना फार अडचण होत नाही. कित्येकदा गल्ली शेजारी असणारी महत्त्वाची दुकाने, ठिकाणे याची माहिती नसल्याने मुलांना एकटे फिरतानाही आपले घर शोधणे अवघड होते. पायी फिरताना मुलांना ठळक खुणा आणि परिसराची माहिती होते.