शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणवाडी बनतेय देशी कोंबड्यांचे गाव परसबागेत उभारले

By admin | Updated: May 26, 2014 01:19 IST

प्रकल्प : पन्नास महिला बनल्या स्वावलंबी; कुटुंबाचे होणार आर्थिक सक्षमीकरण

सातारा : सातारा तालुक्यातील ब्राह्मणवाडीतील महिला कुक्कुटपालनाच्या माध्यमातून स्वावलंबी बनल्या आहेत. येथील महिलांनी परसदारातच देशी कोंबडीपालनाचा प्रकल्प सुरू केल्यामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठा हातभार लागला आहे. देशी कोंबड्या आणि त्यांच्या अंड्यांना ग्राहकांकडून अतिशय चांगली मागणी आहे. याचा विचार करून सातारा जिल्ह्यात ब्राह्मणवाडी येथील परसबागेतील देशी कोंबडी पालनास चालना देण्याच्या दृष्टीने ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’ तथा ‘आत्मा’ने सहकार्य केले आहे. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनी ब्राह्मणवाडी येथे अनुदानातून राबविण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार केला आणि यामध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिके यांचा समावेश केला. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून येथील महिलांना माण तालुक्यातील गोंदवले येथील विवेक फडतरे यांच्या देशी कोंबडी पालन प्रकल्पाच्या ठिकाणी नेण्यात आले. त्यानुसार महिलांनी प्रशिक्षण घेतले. एक दिवसीय प्रशिक्षणादरम्यान सहभागी महिलांना पिलांचे संगोपन, कोंबडी खाद्य तयार करणे, कोंबड्यांची देखभाल त्याचबरोबर निगा राखणे आणि प्रथमोपचार याबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी २५ महिलांना प्रात्यक्षिक स्वरूपात दोन आठवडे वयाची देशी कोंबडीची प्रत्येकी ५० पिले देण्याचे नियोजन केले. मात्र, सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीत पिले लहान असल्यामुळे त्यांना मांजर, घार, कुत्रा यांच्यापासून असलेला धोका लक्षात घेता संरक्षण म्हणून लोखंडी खुराड्यांची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. गावच्या कृषी सहायक रोहिणी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी स्थानिक कारागिरांकून लोखंडी खुराडी तयार करून घेतली. या खुराड्यांसाठी सहभागी महिलांना प्रत्येकी २,८०० रुपये खर्च आला. लाभार्थी महिलांना दोन आठवडे वयाची व लसीकरण पूर्ण झालेली पिले १६ सप्टेंबर २०१३ रोजी देण्यात आली. त्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक लाभार्थीस २५ किलो खाद्य देण्यात आले. खाद्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महिलांना स्थानिक पद्धतीने मका, गहू, ज्वारी, बाजरी याचा उपयोग करण्याबाबत सातारा पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी रूपाली अभंग यांनी मदत केली. या प्रकल्पात सहभागी झालेल्या २५ महिलांपैकी १० महिलांची बँक खाती तासगाव येथील बँकेत खाती उघडण्यात आली. यापैकी पाच महिला ऊसतोडणीसाठी बाहेर असल्यामुळे त्यांची खाती खोलता आली नाहीत. त्या गावात परत आल्यानंतर त्यांची खाती खोलण्यात येणार आहेत. महिलांनी योग्य कोंबडींच्या पिलांची आवश्यक ती काळजी घेतल्यामुळे आणि ‘आत्मा’ तसेच कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग अधिकार्‍यांनी प्रकल्पस्थळी भेटी देऊन महिलांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तीन महिन्यांच्या कालावधीत पिलांचे सरासरी वजन दीड किलो झाले. या प्रकल्पास राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले यांनी भेट देऊन पाहणी केली. येथे त्यांनी महिलांच्या धाडसाचे आणि उपक्रमाचे कौतुक केले. जोडधंदा म्हणून देशी कोंबडीपालन प्रकल्प उत्तम आहे. यामुळे देशी कोंबड्याचे संगोपनदेखील होत आहे. ‘आत्मा’ने दिलेल्या सहकार्यामुळे खात्री पटली आणि महिलांचा आत्मविश्वास वाढला. परिणामी ब्राह्मणवाडीतील महिलांची आर्थिक सक्षमीकरण होण्यास अतिशय मोठी मदत झाली.