शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

ब्राह्मणवाडी बनतेय देशी कोंबड्यांचे गाव परसबागेत उभारले

By admin | Updated: May 26, 2014 01:19 IST

प्रकल्प : पन्नास महिला बनल्या स्वावलंबी; कुटुंबाचे होणार आर्थिक सक्षमीकरण

सातारा : सातारा तालुक्यातील ब्राह्मणवाडीतील महिला कुक्कुटपालनाच्या माध्यमातून स्वावलंबी बनल्या आहेत. येथील महिलांनी परसदारातच देशी कोंबडीपालनाचा प्रकल्प सुरू केल्यामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठा हातभार लागला आहे. देशी कोंबड्या आणि त्यांच्या अंड्यांना ग्राहकांकडून अतिशय चांगली मागणी आहे. याचा विचार करून सातारा जिल्ह्यात ब्राह्मणवाडी येथील परसबागेतील देशी कोंबडी पालनास चालना देण्याच्या दृष्टीने ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’ तथा ‘आत्मा’ने सहकार्य केले आहे. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनी ब्राह्मणवाडी येथे अनुदानातून राबविण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार केला आणि यामध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिके यांचा समावेश केला. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून येथील महिलांना माण तालुक्यातील गोंदवले येथील विवेक फडतरे यांच्या देशी कोंबडी पालन प्रकल्पाच्या ठिकाणी नेण्यात आले. त्यानुसार महिलांनी प्रशिक्षण घेतले. एक दिवसीय प्रशिक्षणादरम्यान सहभागी महिलांना पिलांचे संगोपन, कोंबडी खाद्य तयार करणे, कोंबड्यांची देखभाल त्याचबरोबर निगा राखणे आणि प्रथमोपचार याबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी २५ महिलांना प्रात्यक्षिक स्वरूपात दोन आठवडे वयाची देशी कोंबडीची प्रत्येकी ५० पिले देण्याचे नियोजन केले. मात्र, सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीत पिले लहान असल्यामुळे त्यांना मांजर, घार, कुत्रा यांच्यापासून असलेला धोका लक्षात घेता संरक्षण म्हणून लोखंडी खुराड्यांची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. गावच्या कृषी सहायक रोहिणी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी स्थानिक कारागिरांकून लोखंडी खुराडी तयार करून घेतली. या खुराड्यांसाठी सहभागी महिलांना प्रत्येकी २,८०० रुपये खर्च आला. लाभार्थी महिलांना दोन आठवडे वयाची व लसीकरण पूर्ण झालेली पिले १६ सप्टेंबर २०१३ रोजी देण्यात आली. त्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक लाभार्थीस २५ किलो खाद्य देण्यात आले. खाद्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महिलांना स्थानिक पद्धतीने मका, गहू, ज्वारी, बाजरी याचा उपयोग करण्याबाबत सातारा पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी रूपाली अभंग यांनी मदत केली. या प्रकल्पात सहभागी झालेल्या २५ महिलांपैकी १० महिलांची बँक खाती तासगाव येथील बँकेत खाती उघडण्यात आली. यापैकी पाच महिला ऊसतोडणीसाठी बाहेर असल्यामुळे त्यांची खाती खोलता आली नाहीत. त्या गावात परत आल्यानंतर त्यांची खाती खोलण्यात येणार आहेत. महिलांनी योग्य कोंबडींच्या पिलांची आवश्यक ती काळजी घेतल्यामुळे आणि ‘आत्मा’ तसेच कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग अधिकार्‍यांनी प्रकल्पस्थळी भेटी देऊन महिलांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तीन महिन्यांच्या कालावधीत पिलांचे सरासरी वजन दीड किलो झाले. या प्रकल्पास राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले यांनी भेट देऊन पाहणी केली. येथे त्यांनी महिलांच्या धाडसाचे आणि उपक्रमाचे कौतुक केले. जोडधंदा म्हणून देशी कोंबडीपालन प्रकल्प उत्तम आहे. यामुळे देशी कोंबड्याचे संगोपनदेखील होत आहे. ‘आत्मा’ने दिलेल्या सहकार्यामुळे खात्री पटली आणि महिलांचा आत्मविश्वास वाढला. परिणामी ब्राह्मणवाडीतील महिलांची आर्थिक सक्षमीकरण होण्यास अतिशय मोठी मदत झाली.