शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

वसना नदीवर २७ ठिकाणी बंधारे

By admin | Updated: March 16, 2016 08:34 IST

दुष्काळी भागाला दिलासा : पुनरुज्जीवनाचे काम प्रगतीपथावर

वाठार स्टेशन : वसना नदी पुनरुज्जीवनाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, सोळशी ते पळशी दरम्यान बंधाऱ्यांची कामे वेगात सुरू आहेत. त्यामुळे दुष्काळी उत्तर कोरेगावच्या शेती व पिण्याचा पाणी प्रश्न मार्गी लागून जनतेला दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या नदीवर २७ ठिकाणी बंधारे बांधण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, अर्चना वाघमळे यांनी कामांची पाहणी केली. कामांचा दर्जा व गुणवत्ता याची सविस्तरपणे माहिती घेत त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच ठेकेदार व ग्रामस्थांना महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी भाजपचे दीपक पिसाळ, सुरेश निकम, संभाजी लेंभे, प्रमोद कदम, संजय साळुखे, प्रमोद खराडे, सदानाना साळुंखे, विद्याधर धुमाळ, रवींद्र जगताप, दादा देशमुख आदी उपस्थित होते. वसना नदी पुनरुज्जीवन या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीने पाठपुरावा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी १२.१५ कोटींचा निधी दिला. त्यापैकी ६.१२ कोटी मार्चअखेर खर्च करावयाचे असल्याने बंधाऱ्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामध्ये दहिगाव, घिगेवाडी, पिंपोडे, सोनके, नांदवळ, नायगाव व सोळशी येथील बंधारे समाविष्ट आहेत. (वार्ताहर) तीन कामे पूर्ण होणार...जलसंपदा विभागाच्या कण्हेर विकास विभागाच्या नियंत्रणाखाली होत असलेली ही कामे येणाऱ्या दोन-तीन महिन्यांत पूर्ण होतील, असा विश्वास नितीन पाटील यांनी व्यक्त केला. तसेच बंधाऱ्यांच्या या कामांमुळे भूजल पातळीत वाढ होऊन पाणी जादा दिवस टिकून राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील वसना नदीकाठच्या अनेक गावांचा पाणीप्रश्न संपणार आहे. या नदीवर सध्या २७ मोठे बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. या बंधाऱ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. - दीपक पिसाळ, पिंपोडे बुद्रुक