शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कलंकितांना बाजूला काढा !

By admin | Updated: March 15, 2015 00:16 IST

उदयनराजेंचा अजून एक वार : भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली गेल्यानेच राष्ट्रवादीचा दारूण पराभव

सातारा : ‘राष्ट्रवादी काँगे्रसच्या दारुण पराभवाची कारणमीमांसा ज्या-त्यावेळी झाली असली तरी त्याला जबाबदार असणाऱ्या कंपूलाच पुन्हा संधी मिळेल तिथे सत्तेची पदे देण्याने, पक्षाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याऐवजी आणखीनच काळवंडून जाईल,’ असा आणखी ‘शब्दवार’ खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोठ्या कष्टाने आणि प्रगल्भ क्षमतेने उभारलेल्या पक्षाचे अधिक नुकसान टाळण्यासाठी पक्षातील जनहितविरोधी भ्रष्ट कारभार केलेल्यांची झाडाझडती घेताना आत्मचिंतनात्मक सिंहावलोकन करून अशा कलंकितांना पवारांनी पक्षात नामधारी ठरवावे किंवा बेदखल करावे, जेणेकरून सर्वसामान्यांची पक्षाशी असलेली नाळ पुन्हा जोडली जाऊन पक्षाला पुन्हा गतवैभव मिळेल, असे पत्रकाद्वारे म्हटले आहे. उदयनराजेंनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे लोकसभेतील विधानसभेला झालेले दारुण पानिपत, पक्षातीलच काही अडेलट्टू, गर्विष्ठ आणि एकाधिकारशाही राबविणाऱ्यांच्या एकंदरित कार्यपद्धतीमुळे आणि त्यांनी केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली गेल्यानेच झाले आहे. भ्रष्टाचार इतका मोठा आहे की, सध्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री, भ्रष्टाचाराची चौकशी केली तर खातेच बंद करावे लागेल, असं सागत आहेत. जनहिताकडे डोळेझाक करून सर्व सत्ता उपभोगून पक्षाला अप्रतिष्ठा यांनी मिळवून दिली तरी सुद्धा यांची शिरजोरी कमी झाली नाही. पक्षाचे अनेक आजी-माजी आमदार, पदाधिकारी, हितचिंतक, कार्यकर्ते पक्षातून दूर राहू लागले आहेत. पक्षाच्या अनेक माजी आमदार, खासदारांनी तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आमच्याकडे या भावना व्यक्त केल्या आहेत. याची खात्रीच करावयाची असेल तर तातडीने माजी आमदार, पराभव झालेले उमेदवार यांची तातडीची बैठक घेऊन भावना जाणून घेतल्यास संबंधितांचे उद्दाम, बेमुर्वत, हेकेखोर आणि विलासी वर्तन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भ्रष्टाचाराचा कलंक याचे चित्र स्पष्ट होईल,असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी) )