शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

कलंकितांना बाजूला काढा !

By admin | Updated: March 15, 2015 00:16 IST

उदयनराजेंचा अजून एक वार : भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली गेल्यानेच राष्ट्रवादीचा दारूण पराभव

सातारा : ‘राष्ट्रवादी काँगे्रसच्या दारुण पराभवाची कारणमीमांसा ज्या-त्यावेळी झाली असली तरी त्याला जबाबदार असणाऱ्या कंपूलाच पुन्हा संधी मिळेल तिथे सत्तेची पदे देण्याने, पक्षाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याऐवजी आणखीनच काळवंडून जाईल,’ असा आणखी ‘शब्दवार’ खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोठ्या कष्टाने आणि प्रगल्भ क्षमतेने उभारलेल्या पक्षाचे अधिक नुकसान टाळण्यासाठी पक्षातील जनहितविरोधी भ्रष्ट कारभार केलेल्यांची झाडाझडती घेताना आत्मचिंतनात्मक सिंहावलोकन करून अशा कलंकितांना पवारांनी पक्षात नामधारी ठरवावे किंवा बेदखल करावे, जेणेकरून सर्वसामान्यांची पक्षाशी असलेली नाळ पुन्हा जोडली जाऊन पक्षाला पुन्हा गतवैभव मिळेल, असे पत्रकाद्वारे म्हटले आहे. उदयनराजेंनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे लोकसभेतील विधानसभेला झालेले दारुण पानिपत, पक्षातीलच काही अडेलट्टू, गर्विष्ठ आणि एकाधिकारशाही राबविणाऱ्यांच्या एकंदरित कार्यपद्धतीमुळे आणि त्यांनी केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली गेल्यानेच झाले आहे. भ्रष्टाचार इतका मोठा आहे की, सध्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री, भ्रष्टाचाराची चौकशी केली तर खातेच बंद करावे लागेल, असं सागत आहेत. जनहिताकडे डोळेझाक करून सर्व सत्ता उपभोगून पक्षाला अप्रतिष्ठा यांनी मिळवून दिली तरी सुद्धा यांची शिरजोरी कमी झाली नाही. पक्षाचे अनेक आजी-माजी आमदार, पदाधिकारी, हितचिंतक, कार्यकर्ते पक्षातून दूर राहू लागले आहेत. पक्षाच्या अनेक माजी आमदार, खासदारांनी तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आमच्याकडे या भावना व्यक्त केल्या आहेत. याची खात्रीच करावयाची असेल तर तातडीने माजी आमदार, पराभव झालेले उमेदवार यांची तातडीची बैठक घेऊन भावना जाणून घेतल्यास संबंधितांचे उद्दाम, बेमुर्वत, हेकेखोर आणि विलासी वर्तन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भ्रष्टाचाराचा कलंक याचे चित्र स्पष्ट होईल,असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी) )