शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपचे बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

सातारा : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. महा ...

सातारा : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. महा विकास आघाडी सरकारची ही तालिबानी पद्धत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावसुली आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले, अशी जोरदार टीका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या घटनेचा निषेध म्हणून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व प्रशासनाला निवेदन देण्यात आले, याची प्रत राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आली.

या वेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुकाअध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल, बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, अॅड. प्रशांत खामकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मनीषा पांडे, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर रेपाळ ,व्यापारी आघाडी अध्यक्ष डॉक्टर सचिन साळुंखे, सरचिटणीस मनीष महाडवाले, भटके विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य प्रिया नाईक, नगरसेविका प्राची शहाणे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी,

महिला मोर्चा शहर अध्यक्ष रीना भणगे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सिनेकलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

राज्य सरकारने या निलंबित १२ आमदारांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे. सरकारने ओबीसी आयोगाचे गठन करून त्या माध्यमातून एम्पिरिकल डेटा गोळा करून सर्वोच्च न्यायालयात सादर करून रद्द झालेले ओबीसीचे आरक्षण परत मिळवून द्यावे, जोपर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करू नये, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने बारा आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी निदर्शने करण्यात आली.