शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपचे बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

सातारा : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. महा ...

सातारा : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. महा विकास आघाडी सरकारची ही तालिबानी पद्धत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावसुली आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले, अशी जोरदार टीका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या घटनेचा निषेध म्हणून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व प्रशासनाला निवेदन देण्यात आले, याची प्रत राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आली.

या वेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुकाअध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल, बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, अॅड. प्रशांत खामकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मनीषा पांडे, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर रेपाळ ,व्यापारी आघाडी अध्यक्ष डॉक्टर सचिन साळुंखे, सरचिटणीस मनीष महाडवाले, भटके विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य प्रिया नाईक, नगरसेविका प्राची शहाणे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी,

महिला मोर्चा शहर अध्यक्ष रीना भणगे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सिनेकलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

राज्य सरकारने या निलंबित १२ आमदारांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे. सरकारने ओबीसी आयोगाचे गठन करून त्या माध्यमातून एम्पिरिकल डेटा गोळा करून सर्वोच्च न्यायालयात सादर करून रद्द झालेले ओबीसीचे आरक्षण परत मिळवून द्यावे, जोपर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करू नये, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने बारा आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी निदर्शने करण्यात आली.