शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

मनोमिलनासोबत भाजपनेही

By admin | Updated: November 9, 2016 01:11 IST

भाजपवरही जोरदार टीकास्त्र

सातारा : ‘मनोमिलनाच्या प्रदीर्घ काळाच्या सत्तेमुळे शहराची बकाल अवस्था होऊन बसली आहे. मागील पाच वर्षांत शहरातील मूलभूत प्रश्नही सुटले नाहीत. सध्या मनोमिलनापासून फारकत घेऊन स्वतंत्र लढणाऱ्या भाजप उमेदवारांनीदेखील सत्तेत राहून खीर ओरपली. हे लोक शहरातील नागरिकांना कसा काय न्याय देतील?,’ असा प्रश्न महाराष्ट्र नागरी विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा पवार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला. सीमा पवार यांनी मनोमिलनाच्या सत्तेसह भाजपवरही जोरदार टीकास्त्र झोडले. साताऱ्यात काँगे्रस, राष्ट्रवादी पक्ष नावालाही राहिले नाहीत. दोन्ही पक्ष आघाड्यांच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. केंद्रातील सत्तेच्या जोरावर भाजप साताऱ्यात अच्छे दिन आणण्याच्या बाता मारत आहेत. परंतु त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार याआधी मनोमिलनाच्या सत्तेतच काम करत होत्या. मग त्यांना का अच्छे दिन आणता आले नाहीत? या सर्व पक्षांनी मिळून साताऱ्याच्या विकासाचा निधी लाटला आहे. कायद्यानुसार वॉर्ड समित्या स्थापन करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. सत्ताधाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली. कोट्यवधींचा निधी शहराच्या विकासासाठी वापरल्याचे सांगितले जात असले तरी हा निधी कुठे मुरला? याचा हिशोब शहरवासीयांना द्यावा, मगच निवडणूक लढण्यासाठी पुढे यावे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. प्रचारानिमित्त प्रभागात फिरताना आलेले अनुभव सांगताना सीमा पवार म्हणाल्या, ‘प्रस्थापितांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. लोकांना बदल हवा आहे. पाणी मुबलक असून, त्याचे व्यवस्थापन नाही. गरिबांच्या कस्तुरबा रुग्णालयाला अद्याप टाळे लागलेले आहे. शहरातील पाणी गळती काढली जात नाही. रेल्वे स्टेशनवरून साताऱ्यात यायला अथवा जायलाही सिटी बसची सुविधा नाही. मंडईत पाय ठेवायलाही जागा नसताना कोंडमारा सहन करत लोकांना भाजी खरेदी करावी लागत आहे. पालिकेत गेलो तर अडचणींची नोंद तर होतच नाही, शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता केली जात नाही. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. अस्वच्छतेमुळे लोक आजारी पडण्याची व्यवस्था पालिकेच्या माध्यमातून केली गेली आहे.’ शहरातील विकासकामांच्याही बोऱ्या उडाल्याचे सांगताना सीमा पवार यांनी ‘पालिका शाळांमध्ये बेंचेसची व्यवस्था नाही. मुलांना पोषक आहार दिला जात नाही. भाजप पॅक्ड फूड पुरविण्याची भाषा वापरून मल्टिनॅशनल कंपन्यांचे हित जोपासत आहे. शहरात असणारा दूध संघ बंद आहे. कस्तुरबा रुग्णालय बंद आहे. शहर सुधार समितीच्या माध्यमातून आम्ही याबाबत अनेकदा आंदोलन केली. परंतु दबंगशाहीमुळे कार्यवाही होताना दिसत नाही.’ ‘आम्ही सातारकर पुण्या-मुंबईला रोजगार सप्लाय करणारे आहोत काय? साताऱ्यातील प्रस्थापितांच्या चुकीच्या कारभारामुळे रोजगारासाठी मुले साताऱ्याबाहेर जाऊन स्थायिक होत असून, त्यांचे आई-बाप तेवढे जुन्या घरात राहतात, मुलांशी त्यांचा इंटरनेट कॉलिंगद्वारे संपर्क होतो, त्यामुळे प्रस्थापितांनी साताऱ्यातील अशी अनेक घरे उद्ध्वस्त केली आहे. (लोकमत टीम)२