शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

घरगुती उद्यानातून होतेय पक्षी संवर्धन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:39 IST

खंडाळा : उष्णतेचा उच्चांक आणि पाणीटंचाई यामुळे उन्हाळा नेहमीच त्रासाचा ठरत असतो. वाढत्या उन्हाचा चटका माणसाप्रमाणे पक्ष्यांना ...

खंडाळा : उष्णतेचा उच्चांक आणि पाणीटंचाई यामुळे उन्हाळा नेहमीच त्रासाचा ठरत असतो. वाढत्या उन्हाचा चटका माणसाप्रमाणे पक्ष्यांना बसत असतो. आगामी उन्हाळयात मानवाप्रमाणे त्याचेही स्वर कोरडे पडू नयेत. यासाठी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी खंडाळ्यातील निसर्गप्रेमी रवी पवार यांनी आपल्या घराच्या परिसरातच पक्षी उद्यान उभारले आहे. त्यामुळे शेकडो पक्ष्यांचे जीवनमान सुखकर झाले आहे.

झाडांमध्ये घरटे करून राहणाऱ्या पक्ष्यांचा मधुर आवाज ही पक्ष्यांची खरी ओळख, त्याच्या मधुर आवाजाला आपली नजर नेहमी शोधत असते. रखरखत्या उन्हाने त्यांचा जीव कासावीस होत असतो, परिणामी पक्ष्यांचे जीवन धोक्यात येऊ लागले आहे. उन्हामुळे पक्ष्यांचे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन, बरेच पक्षी उडताना खाली पडल्याचे पाहायला मिळते. काही उष्माघाताने दगावल्याचे दिसून येते. माणूस त्याच्या गरजा अत्याधुनिक सोयी-सुविधांनी तत्काळ पूर्ण करू शकतो; पण या पक्ष्यांचे काय? पक्ष्यांना नैसर्गिक स्त्रोतांतून गरज पूर्ण करावी लागते. त्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होतात. काही पक्षी अंघोळ करून, तर काही पक्षी पाणी पिऊन शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात. हेच पक्षी कीटक, उपद्रवी प्राण्यांवर नियंत्रण तसेच सफाई कामगार आणि बीजप्रसाराचे महत्त्वाचे काम करत असतात. पक्षी हा निसर्गाचा सौंदर्याचा दागिना आहे.

त्याच्या मदतीसाठी येणाऱ्या उन्हाळ्यात पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून या अवलियाने त्याच्या घराच्या परिसरात व स्वतःच्या इमारतीवर सावलीमध्ये त्यांच्या रहिवासाची सोय करून मातीच्या भांड्यामधे पाणी ठेवले आहे. ते पाणी स्वच्छ आणि ठराविक वेळेने बदलले जाते. घराच्या परिसराजवळ आणि बागेत शक्य असेल तिथे कृत्रिम घरटी निर्माण करून खाद्यपदार्थही ठेवण्याची सोय केली आहे. रोज सकाळी शिंजिर, राखी वटवट्या, शिंपी, भांग पाडी मैना, बुलबुल, कोकिळा, चिमणी, टोपीवाला, दयाळ, चष्मेवाला यांसह अनेक प्रकारचे शेकडो पक्षी पाणी पिण्यासाठी आणि बागेत आपले कुटुंब सगोपनासाठी येतात.

कोट..

घराजवळ असणाऱ्या छोट्याशा बागेमध्ये नेहमी काही तरी नवीन पक्ष्यांसाठी करावे, म्हणून मन खटपटत असते. कानाला पक्ष्यांचा आवाज नाही आला, तर मन कासावीस होते. डोळ्यांना पक्षी दिसले नाहीत, तर सुंदर दिवसाची सुरुवात होत नाही.

यंदा उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवण्याची शक्यता असल्याने पक्ष्यांची किलबिलाट अबाधित राहावी, यासाठी कृत्रिम घरटे आणि पाण्याची सोय बागेमध्ये ठीकठिकाणी केली. आपल्या परिसरात सर्वांनी ते करायला हवे, यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करावा. कारण पाणी थंड राहते. भांडे उथळ असावे. खोल भांड्यात लहान पक्षी बुडण्याची भीती असते.

- रवी पवार, निसर्ग मित्र खंडाळा

........................................

फोटो मेल केले आहेत .