शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

केळवलीच्या माथ्यावर महाकाय दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 23:20 IST

बामणोली : सातारा तालुक्याच्या परळी खोऱ्यात डोंगराच्या कुशीत मध्यभागी वसलेल्या केळवली गावालगतच्या डोंगराच्या माथ्यावर महाकाय दगडं धोकादायक स्थितीत आहेत. हे दगड कोसळण्याची स्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली रात्र काढत आहेत.केळवली गावालगतच वरच्या बाजूला मोठा डोंगर असून, अनेक ठिकाणी मोठ-मोठे दगड आहेत. परिसरात पावसाळ्यात चार महिने पावसाची जोरदार अतिपर्जन्यवृष्टी होत ...

बामणोली : सातारा तालुक्याच्या परळी खोऱ्यात डोंगराच्या कुशीत मध्यभागी वसलेल्या केळवली गावालगतच्या डोंगराच्या माथ्यावर महाकाय दगडं धोकादायक स्थितीत आहेत. हे दगड कोसळण्याची स्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली रात्र काढत आहेत.केळवली गावालगतच वरच्या बाजूला मोठा डोंगर असून, अनेक ठिकाणी मोठ-मोठे दगड आहेत. परिसरात पावसाळ्यात चार महिने पावसाची जोरदार अतिपर्जन्यवृष्टी होत असते. त्यामुळे काही ठिकाणी दगडी व झाडे कोसळण्याचे सत्र सुरू असते. पावसामुळे डोंगराच्या जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन महाकाय दगडंउघडे पडू लागले आहेत.महाकाय दगडांचा थांबण्याचा आधारच संपू लागल्याने व ते गावच्या वरच्या बाजूला गावाच्या एकदम एका रेषेत डोंगरमाथ्यावर असल्याने ते जमीन खचल्यास किंवा भूसंख्यलन झाल्यास ते गाववर केव्हाही कोसळून जीवितहानी घडवतील, याचा नेम राहिला नसल्याने जनता जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत.या परिसरात तीन महिन्यांपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने डोंगरराची धूप होऊन पाण्याच्या प्रवाहाबरोबर बरीचमोठे दगडं वाहून येत आहेत. रात्री-अपरात्री एखादा मोठा आवाज झाल्यास जनता घाबरून घराबाहेर धाव घेत आहेत. या दगडांमुळे गावकºयांची पूर्णत: झोप उडाली आहे. गावावर दगड कोसळण्याची स्थिती निर्माण झाल्याने माळीणसारखी परिस्थिती होते की काय? याचा धसकाच घेतला आहे.हे महाकाय दगड हटविण्यासाठी ग्रामस्थांनी एक वर्षापूर्वी जिल्हाधिकाºयांसह सर्व प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते. संबंधित मंडलाधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शिळा धोकादायक असल्याचा अभिप्राय शासनाला पाठविला. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही शासनाला आपले पत्र देऊन दगडी हटविण्याच्या सूचना केल्या आहेत. ग्रामस्थही वारंवार पाठपुरावाही करत आहेत. मात्र अद्याप प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेतली नसल्याने स्थानिक जनता हतबल झाली आहे. दगड कोसळून मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार की काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.दरम्यान, काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील माळीण येथे पावसामुळे डोंगर खचून अनेकजणांना मृत्युमुखी पडावे लागले होते. त्या घटनेची आठवण यानिमित्ताने होत आहे. अशी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची खरी आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर सध्या पाऊस सुरू असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.मोठा आवाज आला तरी थरकापमहाकाय दगडांचा आधारच संपला आहे. त्यामुळे हे मोठे दगडं वेळेतच न हटविल्यास ते केव्हातरी गावावर कोसळू शकतात. हे दगड हटवणे ग्रामस्थांनाही शक्य नसून त्याला प्रशासनाचीच गरज आहे. मात्र या दगडांनी आमची पुरती झोप उडवली. एखादा आवाज झाल्यास आम्हाला धडकी भरते,’ अशी माहिती ग्रामस्थ हरिभाऊ केरेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.