शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

केळवलीच्या माथ्यावर महाकाय दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 23:20 IST

बामणोली : सातारा तालुक्याच्या परळी खोऱ्यात डोंगराच्या कुशीत मध्यभागी वसलेल्या केळवली गावालगतच्या डोंगराच्या माथ्यावर महाकाय दगडं धोकादायक स्थितीत आहेत. हे दगड कोसळण्याची स्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली रात्र काढत आहेत.केळवली गावालगतच वरच्या बाजूला मोठा डोंगर असून, अनेक ठिकाणी मोठ-मोठे दगड आहेत. परिसरात पावसाळ्यात चार महिने पावसाची जोरदार अतिपर्जन्यवृष्टी होत ...

बामणोली : सातारा तालुक्याच्या परळी खोऱ्यात डोंगराच्या कुशीत मध्यभागी वसलेल्या केळवली गावालगतच्या डोंगराच्या माथ्यावर महाकाय दगडं धोकादायक स्थितीत आहेत. हे दगड कोसळण्याची स्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली रात्र काढत आहेत.केळवली गावालगतच वरच्या बाजूला मोठा डोंगर असून, अनेक ठिकाणी मोठ-मोठे दगड आहेत. परिसरात पावसाळ्यात चार महिने पावसाची जोरदार अतिपर्जन्यवृष्टी होत असते. त्यामुळे काही ठिकाणी दगडी व झाडे कोसळण्याचे सत्र सुरू असते. पावसामुळे डोंगराच्या जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन महाकाय दगडंउघडे पडू लागले आहेत.महाकाय दगडांचा थांबण्याचा आधारच संपू लागल्याने व ते गावच्या वरच्या बाजूला गावाच्या एकदम एका रेषेत डोंगरमाथ्यावर असल्याने ते जमीन खचल्यास किंवा भूसंख्यलन झाल्यास ते गाववर केव्हाही कोसळून जीवितहानी घडवतील, याचा नेम राहिला नसल्याने जनता जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत.या परिसरात तीन महिन्यांपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने डोंगरराची धूप होऊन पाण्याच्या प्रवाहाबरोबर बरीचमोठे दगडं वाहून येत आहेत. रात्री-अपरात्री एखादा मोठा आवाज झाल्यास जनता घाबरून घराबाहेर धाव घेत आहेत. या दगडांमुळे गावकºयांची पूर्णत: झोप उडाली आहे. गावावर दगड कोसळण्याची स्थिती निर्माण झाल्याने माळीणसारखी परिस्थिती होते की काय? याचा धसकाच घेतला आहे.हे महाकाय दगड हटविण्यासाठी ग्रामस्थांनी एक वर्षापूर्वी जिल्हाधिकाºयांसह सर्व प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते. संबंधित मंडलाधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शिळा धोकादायक असल्याचा अभिप्राय शासनाला पाठविला. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही शासनाला आपले पत्र देऊन दगडी हटविण्याच्या सूचना केल्या आहेत. ग्रामस्थही वारंवार पाठपुरावाही करत आहेत. मात्र अद्याप प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेतली नसल्याने स्थानिक जनता हतबल झाली आहे. दगड कोसळून मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार की काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.दरम्यान, काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील माळीण येथे पावसामुळे डोंगर खचून अनेकजणांना मृत्युमुखी पडावे लागले होते. त्या घटनेची आठवण यानिमित्ताने होत आहे. अशी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची खरी आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर सध्या पाऊस सुरू असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.मोठा आवाज आला तरी थरकापमहाकाय दगडांचा आधारच संपला आहे. त्यामुळे हे मोठे दगडं वेळेतच न हटविल्यास ते केव्हातरी गावावर कोसळू शकतात. हे दगड हटवणे ग्रामस्थांनाही शक्य नसून त्याला प्रशासनाचीच गरज आहे. मात्र या दगडांनी आमची पुरती झोप उडवली. एखादा आवाज झाल्यास आम्हाला धडकी भरते,’ अशी माहिती ग्रामस्थ हरिभाऊ केरेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.