शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तोट्या नसलेल्या नळांमुळे मोठा तोटा

By admin | Updated: May 12, 2016 23:44 IST

सातारकरांचा पुढाकार : सदरबझार परिसरात स्वखर्चाने केली नळांची दुरुस्ती

सातारा : ‘पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय जीवसृष्टीची कल्पनाही कोणी करू शकत नाही,’ असे आपण नेहमी म्हणत असतो; पण पाणी वाचविण्याबाबत आपण नेहमीच टाळाटाळ करत असतो. पण आता पाण्याचे महत्त्व आता कळून चुकल्याने सातारा शहरातील युवक, महिला पाणीबचतीसाठी विविध उपाय करत आहेत. काही नागरिकांनी शहरातील विविध भागांतील नळांना तोट्या बसवून वाया जाणारे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.जलसाक्षरतेसाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र अभियाना’ला विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्याचे मोल समजू लागले आहे. त्यामुळे पाणीबचतीची चळवळ सुरू झाली आहे. ‘जलमित्र अभियान’अंतर्गत साताऱ्यातील निमिश शहा यांनी मित्रांना घेऊन सदर बझार येथील हाउसिंग सोेसायटी, बंगले, झोपडपट्टी या भागांत फिरून तोट्या नसलेल्या नळांचा सर्व्हे केला. त्यानंतर एक प्लंबर बरोबर घेऊन त्यांनी जवळपास वीस नळांना तोट्या बसविल्या. तसेच लिकेजही काढण्यात आले आहे.घरात असलेल्या नळांनाही अनेकजण तोट्या बसवित नाहीत. यासाठी कविता शहा, प्रदीप कामटे हे जलमित्र बनून पाणीबचतीचे आवाहन करत आहेत. (प्रतिनिधी)मोफत प्लंबरची सोयआजही शहरात अनेक ठिकाणी नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी वाया जाते. अशा नळांचा सर्व्हे करून आम्ही त्यांना तोट्या बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. तसेच प्लंबरला बरोबर घेऊन नळांचे लिकेजही काढत आहे. यामुळे काही प्रमाणात पाणीबचत होणार आहे.- निमिश शहा, सातारापाणीबचतीचे आवाहनदुष्काळामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे. याबाबत जलमित्र म्हणून नातेवाइक, मित्रपरिवार यांना नळांना तोट्या बसविण्याबरोबरच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत आवाहन करत आहे.- प्रदीप कामटे, सातारा