शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘भीमाई’ पुरस्काराने समाजकार्याची उमेद वाढली

By admin | Updated: December 7, 2015 00:27 IST

मुक्ता दाभोलकर : ‘संबोधी’च्या वितरण सोहळ्यात अनेक सामाजिक विषयांना उजाळा

 सातारा : संबोधी प्रतिष्ठानने दिलेल्या ‘मातोश्री भीमाई’ पुरस्काराने समाजकार्याची उमेद वाढली असून, यापुढील काळात डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे कार्य जोमाने सुरू ठेवणार असल्याचे मुक्ता दाभोंलकर यांनी सांगितले. पुरस्काराची पाच हजारांची रक्कम अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी खर्च करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.साहित्य, सांस्कृतिक तसेच समाजकार्यात कार्यरत असलेल्या व्यक्तीला संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने ‘मातोश्री भीमाई आंबेडकर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा ‘मातोश्री भीमाई आंबेडकर’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा दया पवार यांच्या हस्ते रविवारी मुक्ता दाभोलकर यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुक्ता दाभोलकार बोलत होत्या.हा कार्यक्रम विविध मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब होवाळे, दिनकर झिंब्रे, रमेश इंजे हे होते. या कार्यक्रमास डॉ. चित्रा दाभोलकर, ज्येष्ठ विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर, किशोर बेडकिहाळ ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अभय सरू, अभय कांता उपस्थित होते. (प्रतिनिधी)डॉ. दाभोलकरांचे कार्य पुढे सुरू ठेवणार... ---संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने १८ वा ‘मातोश्री भीमाई आंबेडकर’ पुरस्कार मुक्ता दाभोलकर यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रोख पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे होते. पुरस्काराची रक्कम अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी खर्च करणार असल्याचे सांगून मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, ‘माझे बाबा डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी समाजातील अनेक लोकांशी आपली नाळ जोडली होती. त्यांनी सुरू केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य मी जोमाने पुढे सुरू ठेवणार आहे. संबोधी प्रतिष्ठान ज्या मुल्यांच्या आधारावर कार्य करीत आहे, त्यावरच मी काम करीत आहे. या पुरस्काराने मला त्यासाठीचे बळ मिळाले असून, उमेद वाढली आहे. मला हा पुरस्कार मिळाल्याने मी खरोखरंच भाग्यवान समजते.’मुक्ता दाभोलकरांचे कार्य कौतुकास्पद अध्यक्षीय भाषणात प्रज्ञा पवार यांनी मुक्ता दाभोलकरांचे कौतुक केले. तिला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे, ‘अत्यंत इष्ट अभिवाट आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांना ही खरी श्रद्धांजली ठरणार आहे. सध्याचा काळ स्त्रीविषयी हिंसाचार वाढण्याचा आहे. कौर्याला शौर्य समजून वाटचाल करणाऱ्या संघटना वाढल्या आहेत. असा आरोपही याप्रसंगी प्रज्ञा पवार यांनी केला.कार्यक्रमात दिनकर झिंब्रे, अण्णासाहेब होवाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.