शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; दडी कायम असल्याने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:25 IST

सातारा : जिल्ह्यात पावसाने मारलेली दडी कायम असून जूनपासून आतापर्यंतचा विचार करता सरासरीपेक्षा कमीच पर्जन्यमान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची ...

सातारा : जिल्ह्यात पावसाने मारलेली दडी कायम असून जूनपासून आतापर्यंतचा विचार करता सरासरीपेक्षा कमीच पर्जन्यमान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. तसेच दुबार पेरणीचेही संकट निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात या वर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात माॅन्सूनचा पाऊस दाखल झाला. वेळेवर सुरुवात केलेल्या पावसाने सुरुवातीच्या काही दिवसांत दमदार हजेरी लावली. पश्चिम भागात तर धुवाधार पाऊस कोसळत होता. सलग चार दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. तर मागील २० दिवसांपासून पावसाची दडी कायम आहे. सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या भरवशावर पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. भातलावणीची कामे सुरु केली. पूर्व भागातही ओल पाहून अनेक शेतकऱ्यांनी खरीपची पेरणी उरकली. पण, आता २० दिवसांपासून पावसाची दडी असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पिके चांगली उगवली आहेत. अशा काळात पाण्याची आवश्यकता असते. पण, सध्या पावसाचे आगमनच नाही. त्यामुळे पिके सुकू लागली आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर दुबार पेरणी करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. तर पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केलेली नाही. पाऊस पडेल या आशेवर शेतकरी होते.

चौकट :

जिल्ह्यात सरासरी १९८ मिलिमीटर पाऊस...

जिल्ह्यात जून महिन्यापासून ५ जुलैपर्यंत सरासरी २३४ मिलिमीटर पाऊस पडतो. पण, या वर्षी फक्त १९८ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सातारा, कऱ्हाड, जावळी, पाटण, कोरेगाव, खटाव, खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर या तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे.

.........................................................