शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; दडी कायम असल्याने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:25 IST

सातारा : जिल्ह्यात पावसाने मारलेली दडी कायम असून जूनपासून आतापर्यंतचा विचार करता सरासरीपेक्षा कमीच पर्जन्यमान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची ...

सातारा : जिल्ह्यात पावसाने मारलेली दडी कायम असून जूनपासून आतापर्यंतचा विचार करता सरासरीपेक्षा कमीच पर्जन्यमान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. तसेच दुबार पेरणीचेही संकट निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात या वर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात माॅन्सूनचा पाऊस दाखल झाला. वेळेवर सुरुवात केलेल्या पावसाने सुरुवातीच्या काही दिवसांत दमदार हजेरी लावली. पश्चिम भागात तर धुवाधार पाऊस कोसळत होता. सलग चार दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. तर मागील २० दिवसांपासून पावसाची दडी कायम आहे. सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या भरवशावर पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. भातलावणीची कामे सुरु केली. पूर्व भागातही ओल पाहून अनेक शेतकऱ्यांनी खरीपची पेरणी उरकली. पण, आता २० दिवसांपासून पावसाची दडी असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पिके चांगली उगवली आहेत. अशा काळात पाण्याची आवश्यकता असते. पण, सध्या पावसाचे आगमनच नाही. त्यामुळे पिके सुकू लागली आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर दुबार पेरणी करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. तर पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केलेली नाही. पाऊस पडेल या आशेवर शेतकरी होते.

चौकट :

जिल्ह्यात सरासरी १९८ मिलिमीटर पाऊस...

जिल्ह्यात जून महिन्यापासून ५ जुलैपर्यंत सरासरी २३४ मिलिमीटर पाऊस पडतो. पण, या वर्षी फक्त १९८ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सातारा, कऱ्हाड, जावळी, पाटण, कोरेगाव, खटाव, खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर या तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे.

.........................................................