शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; दडी कायम असल्याने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:25 IST

सातारा : जिल्ह्यात पावसाने मारलेली दडी कायम असून जूनपासून आतापर्यंतचा विचार करता सरासरीपेक्षा कमीच पर्जन्यमान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची ...

सातारा : जिल्ह्यात पावसाने मारलेली दडी कायम असून जूनपासून आतापर्यंतचा विचार करता सरासरीपेक्षा कमीच पर्जन्यमान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. तसेच दुबार पेरणीचेही संकट निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात या वर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात माॅन्सूनचा पाऊस दाखल झाला. वेळेवर सुरुवात केलेल्या पावसाने सुरुवातीच्या काही दिवसांत दमदार हजेरी लावली. पश्चिम भागात तर धुवाधार पाऊस कोसळत होता. सलग चार दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. तर मागील २० दिवसांपासून पावसाची दडी कायम आहे. सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या भरवशावर पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. भातलावणीची कामे सुरु केली. पूर्व भागातही ओल पाहून अनेक शेतकऱ्यांनी खरीपची पेरणी उरकली. पण, आता २० दिवसांपासून पावसाची दडी असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पिके चांगली उगवली आहेत. अशा काळात पाण्याची आवश्यकता असते. पण, सध्या पावसाचे आगमनच नाही. त्यामुळे पिके सुकू लागली आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर दुबार पेरणी करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. तर पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केलेली नाही. पाऊस पडेल या आशेवर शेतकरी होते.

चौकट :

जिल्ह्यात सरासरी १९८ मिलिमीटर पाऊस...

जिल्ह्यात जून महिन्यापासून ५ जुलैपर्यंत सरासरी २३४ मिलिमीटर पाऊस पडतो. पण, या वर्षी फक्त १९८ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सातारा, कऱ्हाड, जावळी, पाटण, कोरेगाव, खटाव, खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर या तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे.

.........................................................