शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
2
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
5
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
6
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
7
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
8
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
9
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
10
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
11
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
12
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
13
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
16
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
17
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
18
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
20
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

आता व्हा आत्मनिर्भर; १९२ जणांना मिळणार १० लाखांपर्यंत अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये जिल्ह्यातील १९२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये जिल्ह्यातील १९२ जणांना १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. तसेच या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना होणार आहे. दरम्यान, या योजनेत गूळ प्रक्रियेला अधिक प्रधान्य मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाच्यावतीने ही योजना नवीन सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वैयक्तिक शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी उत्पादन संस्था यांना प्रक्रिया उद्योगासाठी अर्थसहाय देण्यात येणार आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ या वर्षांत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केलेली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यात सर्वाधिक गूळ उत्पादन व प्रक्रियेवर अधिक भर देण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.

सातारा जिल्ह्याला एकूण १९२ चे उद्दिष्ट मिळालेले आहे. या उद्दिष्टांपैकी ५९ जणांचेच अर्ज आतापर्यंत मिळालेले आहेत. ५३ अर्जांवर प्रक्रिया सुरू झाली असून, ६ जणांनी अजून कागदपत्रे दिलेली नाहीत. या योजनेअंर्गत बँक कर्जाशी निगडीत प्रकल्प खर्चाच्या कमाल ३५ टक्क्यांपर्यंत किंवा १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. यामुळे उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फायदाच होणार आहे.

................

तालुकानिहाय उद्दिष्ट...

माण १८

खटाव १९

फलटण १८

कोरेगाव १७

खंडाळा १६

वाई १७

जावळी १५

महाबळेश्वर १५

सातारा २०

कऱ्हाड २०

पाटण १७

.................................

कोणाला घेता येणार लाभ...

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नत योजनेत वैयक्तिक शेतकरी, स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहायक उत्पादक संस्था आदी घटक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांना अधिकाधिक १० लाखांपर्यंत अर्थसहाय्य करण्याची तरतूद या योजनेत आहे. तसेच प्रकल्पाच्या ३५ टक्क्यांपर्यंत मदत मिळू शकते, अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली.

.............................................

पोर्टलवर करावा लागतो अर्ज...

- जिल्ह्याला एक वर्षासाठी १९२ चे उद्दिष्ट मिळालेले आहे. या योजनेसाठी प्रकियाही सुरू झालेली आहे. त्यासाठी संबंधितांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावे लागत आहेत.

- या पोर्टलवर सातारा जिल्ह्यासाठी आतापर्यंत ५९ अर्ज आलेले आहेत. या योजनेतून लाभार्थी विविध प्रकारची उत्पादने घेऊ शकतात. तसेच या योजनेतून त्यांना स्वयंपूर्णही होण्याचा मार्ग सापडणार आहे.

.........................................................

कोणालाही उद्योग सुरू करता येणार...

- केंद्र शासनाची ही योजना ठराविक व्यक्ती, गटासाठी नाही. त्यामुळे या योजनेसाठी कोणीही अर्ज करून लाभ घेऊ शकतात. चणे, लाह्यासारखा छोटा प्रक्रिया उद्योगही यामधून करता येऊ शकतो.

- जिल्ह्यासाठी उद्दिष्ट आले असले, तरी त्यांना लाभ देण्याचे काम सुरू झालेले आहे. कृषी विभागाकडून ५३ अर्जांवर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच खाद्य उद्योग सुरू होणार आहेत.

- जिल्ह्यात या योजनेअंतर्गत गूळ प्रक्रियेचा अधिक विचार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

..................................................................