शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

आता व्हा आत्मनिर्भर; १९२ जणांना मिळणार १० लाखांपर्यंत अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये जिल्ह्यातील १९२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये जिल्ह्यातील १९२ जणांना १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. तसेच या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना होणार आहे. दरम्यान, या योजनेत गूळ प्रक्रियेला अधिक प्रधान्य मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाच्यावतीने ही योजना नवीन सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वैयक्तिक शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी उत्पादन संस्था यांना प्रक्रिया उद्योगासाठी अर्थसहाय देण्यात येणार आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ या वर्षांत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केलेली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यात सर्वाधिक गूळ उत्पादन व प्रक्रियेवर अधिक भर देण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.

सातारा जिल्ह्याला एकूण १९२ चे उद्दिष्ट मिळालेले आहे. या उद्दिष्टांपैकी ५९ जणांचेच अर्ज आतापर्यंत मिळालेले आहेत. ५३ अर्जांवर प्रक्रिया सुरू झाली असून, ६ जणांनी अजून कागदपत्रे दिलेली नाहीत. या योजनेअंर्गत बँक कर्जाशी निगडीत प्रकल्प खर्चाच्या कमाल ३५ टक्क्यांपर्यंत किंवा १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. यामुळे उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फायदाच होणार आहे.

................

तालुकानिहाय उद्दिष्ट...

माण १८

खटाव १९

फलटण १८

कोरेगाव १७

खंडाळा १६

वाई १७

जावळी १५

महाबळेश्वर १५

सातारा २०

कऱ्हाड २०

पाटण १७

.................................

कोणाला घेता येणार लाभ...

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नत योजनेत वैयक्तिक शेतकरी, स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहायक उत्पादक संस्था आदी घटक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांना अधिकाधिक १० लाखांपर्यंत अर्थसहाय्य करण्याची तरतूद या योजनेत आहे. तसेच प्रकल्पाच्या ३५ टक्क्यांपर्यंत मदत मिळू शकते, अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली.

.............................................

पोर्टलवर करावा लागतो अर्ज...

- जिल्ह्याला एक वर्षासाठी १९२ चे उद्दिष्ट मिळालेले आहे. या योजनेसाठी प्रकियाही सुरू झालेली आहे. त्यासाठी संबंधितांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावे लागत आहेत.

- या पोर्टलवर सातारा जिल्ह्यासाठी आतापर्यंत ५९ अर्ज आलेले आहेत. या योजनेतून लाभार्थी विविध प्रकारची उत्पादने घेऊ शकतात. तसेच या योजनेतून त्यांना स्वयंपूर्णही होण्याचा मार्ग सापडणार आहे.

.........................................................

कोणालाही उद्योग सुरू करता येणार...

- केंद्र शासनाची ही योजना ठराविक व्यक्ती, गटासाठी नाही. त्यामुळे या योजनेसाठी कोणीही अर्ज करून लाभ घेऊ शकतात. चणे, लाह्यासारखा छोटा प्रक्रिया उद्योगही यामधून करता येऊ शकतो.

- जिल्ह्यासाठी उद्दिष्ट आले असले, तरी त्यांना लाभ देण्याचे काम सुरू झालेले आहे. कृषी विभागाकडून ५३ अर्जांवर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच खाद्य उद्योग सुरू होणार आहेत.

- जिल्ह्यात या योजनेअंतर्गत गूळ प्रक्रियेचा अधिक विचार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

..................................................................