शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

कोरोनात काळजी घ्या; जीवघेणा ‘टेन्शन’ नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST

कऱ्हाड : कोरोनाने होणारा मृत्यू धक्कादायक असला तरी कोरोनामुक्तीचा वाढता टक्काही दिलासा देणारा आहे. कऱ्हाडचा विचार करता तालुक्याचा ‘रिकव्हरी ...

कऱ्हाड : कोरोनाने होणारा मृत्यू धक्कादायक असला तरी कोरोनामुक्तीचा वाढता टक्काही दिलासा देणारा आहे. कऱ्हाडचा विचार करता तालुक्याचा ‘रिकव्हरी रेट’ ८८.२५ टक्के असून मृत्यूदर २.९८ टक्क्यांवर आहे. त्यातही मृत्यू होण्यामागे इतर आजार व नाहक भीती या कारणांचाही समावेश असून फक्त कोरोनानेच मृत्यू होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

कोरोनाची दुसरी लाट वेगवान आहे. संक्रमण कित्येक पटींनी वाढले आहे. त्यामुळे साहजिकच सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. प्रत्येकाच्या मनात चिंतेचे काहूर असून कोरोनाशी लढायचं कसं, हा प्रश्न प्रत्येकाला सतावतोय. या रोगाविषयी सुरूवातीपासूनच मोठी भीती आहे. बदलता स्ट्रेन्थ, बदलती लक्षणे, अनिश्चित उपचारपद्धती यामुळे गोंधळाची स्थिती आहे. अद्यापही हा गोंधळ कमी झालेला नाही. काहीवेळा ज्याला कसलीच लक्षणे नाहीत त्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येतो. तर काहीवेळा एका लॅबचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ तर दुसऱ्या लॅबचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याचीही शेकडो उदाहरणे आहेत. एकूणच कोरोनाविषयी तर्क लावणे अथवा ठोसपणे काहीही सांगणे सध्यातरी मूर्खपणाचे आहे.

कोरोनाने मृत्यू ओढावू शकतो, हे जरी सत्य असले तरी कोरोना हा ‘टेन्शन’चा नव्हे तर चिंतेचा विषय आहे, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. काळजी घेतल्यास, मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास आणि प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळल्यास आपण कोरोनापासून दूर राहू शकतो.

- चौकट

रिकव्हरी रेट : ८८.२५%

अ‍ॅक्टिव्ह रेट : ८.५६%

मृत्यू दर : २.९८%

- चौकट

लेखाजोखा

तालुक्याची लोकसंख्या : ५८७४११

झालेल्या कोरोना चाचण्या : ८३०५०

- चौकट

बाधितांचे प्रमाण

लोकसंख्येच्या तुलनेत : २.०६%

चाचणीच्या तुलनेत : १४.६०%

- चौकट

मृत्यू ३६१; पैकी व्याधीग्रस्त १९९

कऱ्हाड तालुक्यात सोमवार अखेर ३६१ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, त्यापैकी १९९ रुग्ण मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनीसह इतर आजार असणारे ‘कोमॉर्बिड’ म्हणजेच व्याधीग्रस्त होते. तसेच रुग्णांमधील भीतीही काहीवेळा मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे उंब्रजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी सांगितले.

- चौकट

लसीकरणाचा भक्कम आधार

एकीकडे कोरोना संक्रमण वाढत असले तरी दुसरीकडे लसीकरणाने वेग घेतला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेकडे पूर्वानुभव आणि गतवर्षीच्या तुलनेत चांगल्या सुविधा उपलब्ध असल्याने ही बाब संक्रमण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी भक्कम आधार ठरत आहेत.

- कोट

तत्काळ निदान, तातडीने उपचार!

त्रास झाला, कोरोनाची लक्षणे वाटली तर तातडीने चाचणी करून घ्यावी. अनेकवेळा रुग्ण लक्षणे लपवतात. अंगावर काढतात. त्यामुळे उशिरा निदान होऊन उपचारालाही विलंब होतो. परिणामी, मृत्यू ओढवतो. तत्काळ निदान, तातडीने उपचार हा कोरोनामुक्तीचा कानमंत्र आहे.

- डॉ. संगीता देशमुख

तालुका वैद्यकीय अधिकारी

- चौकट

त्रिसूत्री लक्षात ठेवा!

मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स ही कोरोनापासून बचावाची त्रिसूत्री आहे. त्याचा प्रत्येकाने अवलंब करावा, असे आवाहन इंदोलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता माने यांनी केले आहे.

- चौकट

तातडीने चाचणी, वेळेत उपचार!

कोरोना झालाच तरी घाबरण्याचे कारण नाही. लक्षणे जाणवताच तातडीने चाचणी आणि वेळेत उपचार करून घेतल्यास कोरोना बरा होऊ शकतो, असे कालेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र यादव यांनी सांगितले.

फोटो : १९केआरडी०१

कॅप्शन : प्रतीकात्मक