शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कठड्यांमुळे वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारास अडथळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

पेट्री : शहराच्या पश्चिमेस सातारा-कास रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. या मार्गावर आटाळी गावच्या हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा ...

पेट्री : शहराच्या पश्चिमेस सातारा-कास रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. या मार्गावर आटाळी गावच्या हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक भिंतींचे बांधकाम करण्यात आले आहे. या भिंतींमुळे वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असून, रस्ता अरुंद झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.

जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठार व तलाव परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. फुलांच्या हंगामात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. सातारा-कास रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचण्याचे कारण देत, रस्त्याच्या दुतर्फा उंच व सलगपणे भिंती बांधल्या आहेत. आटाळी गावच्या हद्दीपासून कास पठारपर्यंत दोन्ही बाजूला विपूल जंगल आहे. या जंगलातील प्राण्यांची रस्त्याच्या दोन्ही बाजूला ये-जा सुरू असते. रस्त्याच्या वरील बाजूस काही गुहा तर रस्त्याच्या खालील बाजूस पाणवठे आहेत, परंतु या कठड्यांमुळे नैसर्गिक जंगल वाटा अडल्या जाऊन वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होऊ लागले आहे.

(कोट)

आटाळी गावच्या हद्दीतील काही ठिकाणापासून ते घाटाई फाट्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा कठडे वनविभागाच्या हद्दीतच बांधले आहेत. त्यामुळे वनविभागाच्या हद्दीतच रस्ता खचतो का? या कठड्यांबाबत बांधकाम व वनविभागाकडे चौकशी केली, परंतु समाधानकारक माहिती मिळाली नाही. वन्य जिवांना मुक्त वावर करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत.

- सोमनाथ जाधव, माजी अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती

(चौकट)

रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या संरक्षक कठड्यांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. चार दिवसांपूर्वी एका चारचाकीला या ठिकाणी अपघात झाला होता. अपघातात जीवितहानी झाली नाही, परंतु वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हे संरक्षक कठडे अनेक अडचणी निमार्ण करू लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

फोटो : 11 सागर चव्हाण

कास मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतींमुळे वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारात अडथळे निर्माण होत आहेत. (छाया : सागर चव्हाण)