शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

बामणवाडी तलाव असून अडचण नसून खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची दुष्काळकाळात बांधणी करण्यात आली. तेव्हापासून या तलावास पायातूनच गळती असल्याने ...

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची दुष्काळकाळात बांधणी करण्यात आली. तेव्हापासून या तलावास पायातूनच गळती असल्याने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पाणीसाठा संपुष्टात येत आहे. आजवर दोनवेळा गळती काढण्यात आली, मात्र गळती थांबवण्यात संबंधित लघुपाटबंधारे विभागाला यश आले नसल्याने तलाव असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

१९७२ च्या दुष्काळानंतर शासनाने ग्रामीण, डोंगरी विभागात जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी पाझर तलाव बांधणी करण्यास सुरुवात केली. या तलावांच्या माध्यमातून पाणी अडविण्यात येऊ लागले. याचदरम्यान १०८०-८१ ला बामणवाडी येथील पाझर तलाव बांधणी करण्यास आली. यावेळी शेतकऱ्यांनी तलाव झाल्यास पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, या आशेने चालू जमीन विनामोबदला तलावनिर्मितीसाठी दिल्या. मात्र, बांधणीपासून या तलावास गळती असल्याने पाणीसाठा जास्त काळ टिकून राहू शकला नाही. मात्र, आज ना उद्या तलाव दुरुस्ती केल्यानंतर आपले स्वप्न पूर्ण होतील, या आशेवर शेतकरी राहिला. मात्र अनेक शेतकरी स्वप्न सत्यात पाहण्याअगोदरच स्वर्गवासी झाले. मात्र, त्यांनी पाहिलेली स्वप्नं त्यांच्या नातवंडांनाही अजून प्रत्यक्ष अनुभवयास मिळाली नाहीत. २०१९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेत बामणवाडी समाविष्ट करण्यात आल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात पुन्हा या तलावाची गळती काढण्यात आली. यावेळी नवीन तंत्रज्ञान वापरून एचडीपी (प्लॅस्टिक )पेपरचा वापर करण्यात आला. यावेळी तलावाच्या भिंतीच्या आतील बाजूस चर खोदून हा पेपर टाकण्यात आला. यावेळी संबंधित ठेकेदाराकडून फाटका पेपर टाकण्यात आला. यावेळी संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी फाटका पेपर असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी पेपर चिकटवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, चिकटवला नसल्याचे बोलले जात आहे. गळती काढण्यात आल्यानंतर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. तलाव पूर्ण क्षमतेने भरला गेला. यावेळी तलावात पाणीसाठा टिकून राहील, या आशेने शेतकरी समाधानी झाला होता. मात्र जास्त वेळ समाधान टिकून राहिले नाही. तलाव पूर्ण क्षमतेने भरला तरीही नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण पाणीसाठा संपुष्टात येत आहे.

चौकट..

ठेकेदाराने केवळ चार दिवसांत काम उरकले...

तलावाची गळती काढण्यात यावी म्हणून स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे मागणी केली. मात्र, गळती काढण्यास निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने अनेक दिवस काम रेंगाळले गेले. त्यानंतर १५ मार्च २००१ ला लघुपाटबंधारे विभागाने तलाव दुरुस्तीकामी मंजुरी दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या नावे ६५ हजार रुपयांचे टेंडर काढण्यात आले. मात्र, ग्रामपंचायतीस कोणतीही माहिती न देता दुसऱ्या ठेकेदाराला काम देण्यात आले. या ठेकेदाराने शासनाचे नियम बासनात गुंडाळून चार दिवसांत काम पूर्ण केले. गळती काढल्यानंतर पहिल्यापेक्षा दुप्पट गळती वाढली. ती कायम तशीच राहिली.

चौकट :

गाळ काढल्यास बारमाही पाणीसाठा...

तलावाची गळती व गाळ काढल्यास बारमाही पाणीसाठा टिकून राहू शकतो. पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने या तलावाची रचना असल्याने विद्युतमोटरीशिवाय पाइपलाइन, पाटाद्वारे काही क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. या पाणीसाठ्यामुळे परिसरातील विहिरींना पाणी स्त्रोत वाढून उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईपासून मुक्ती मिळू शकते.