शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
5
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
6
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
7
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
8
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
9
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
10
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
11
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
12
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
13
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
14
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
15
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
16
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
17
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
18
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
20
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली

बामणवाडी तलाव असून अडचण नसून खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची दुष्काळकाळात बांधणी करण्यात आली. तेव्हापासून या तलावास पायातूनच गळती असल्याने ...

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची दुष्काळकाळात बांधणी करण्यात आली. तेव्हापासून या तलावास पायातूनच गळती असल्याने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पाणीसाठा संपुष्टात येत आहे. आजवर दोनवेळा गळती काढण्यात आली, मात्र गळती थांबवण्यात संबंधित लघुपाटबंधारे विभागाला यश आले नसल्याने तलाव असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

१९७२ च्या दुष्काळानंतर शासनाने ग्रामीण, डोंगरी विभागात जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी पाझर तलाव बांधणी करण्यास सुरुवात केली. या तलावांच्या माध्यमातून पाणी अडविण्यात येऊ लागले. याचदरम्यान १०८०-८१ ला बामणवाडी येथील पाझर तलाव बांधणी करण्यास आली. यावेळी शेतकऱ्यांनी तलाव झाल्यास पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, या आशेने चालू जमीन विनामोबदला तलावनिर्मितीसाठी दिल्या. मात्र, बांधणीपासून या तलावास गळती असल्याने पाणीसाठा जास्त काळ टिकून राहू शकला नाही. मात्र, आज ना उद्या तलाव दुरुस्ती केल्यानंतर आपले स्वप्न पूर्ण होतील, या आशेवर शेतकरी राहिला. मात्र अनेक शेतकरी स्वप्न सत्यात पाहण्याअगोदरच स्वर्गवासी झाले. मात्र, त्यांनी पाहिलेली स्वप्नं त्यांच्या नातवंडांनाही अजून प्रत्यक्ष अनुभवयास मिळाली नाहीत. २०१९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेत बामणवाडी समाविष्ट करण्यात आल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात पुन्हा या तलावाची गळती काढण्यात आली. यावेळी नवीन तंत्रज्ञान वापरून एचडीपी (प्लॅस्टिक )पेपरचा वापर करण्यात आला. यावेळी तलावाच्या भिंतीच्या आतील बाजूस चर खोदून हा पेपर टाकण्यात आला. यावेळी संबंधित ठेकेदाराकडून फाटका पेपर टाकण्यात आला. यावेळी संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी फाटका पेपर असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी पेपर चिकटवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, चिकटवला नसल्याचे बोलले जात आहे. गळती काढण्यात आल्यानंतर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. तलाव पूर्ण क्षमतेने भरला गेला. यावेळी तलावात पाणीसाठा टिकून राहील, या आशेने शेतकरी समाधानी झाला होता. मात्र जास्त वेळ समाधान टिकून राहिले नाही. तलाव पूर्ण क्षमतेने भरला तरीही नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण पाणीसाठा संपुष्टात येत आहे.

चौकट..

ठेकेदाराने केवळ चार दिवसांत काम उरकले...

तलावाची गळती काढण्यात यावी म्हणून स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे मागणी केली. मात्र, गळती काढण्यास निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने अनेक दिवस काम रेंगाळले गेले. त्यानंतर १५ मार्च २००१ ला लघुपाटबंधारे विभागाने तलाव दुरुस्तीकामी मंजुरी दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या नावे ६५ हजार रुपयांचे टेंडर काढण्यात आले. मात्र, ग्रामपंचायतीस कोणतीही माहिती न देता दुसऱ्या ठेकेदाराला काम देण्यात आले. या ठेकेदाराने शासनाचे नियम बासनात गुंडाळून चार दिवसांत काम पूर्ण केले. गळती काढल्यानंतर पहिल्यापेक्षा दुप्पट गळती वाढली. ती कायम तशीच राहिली.

चौकट :

गाळ काढल्यास बारमाही पाणीसाठा...

तलावाची गळती व गाळ काढल्यास बारमाही पाणीसाठा टिकून राहू शकतो. पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने या तलावाची रचना असल्याने विद्युतमोटरीशिवाय पाइपलाइन, पाटाद्वारे काही क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. या पाणीसाठ्यामुळे परिसरातील विहिरींना पाणी स्त्रोत वाढून उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईपासून मुक्ती मिळू शकते.