शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
3
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
4
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
5
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
6
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
7
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
8
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
9
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
10
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
11
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
12
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
13
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
14
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
15
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
16
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
17
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
18
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
19
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
20
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?

बामणवाडी तलाव असून अडचण नसून खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची दुष्काळकाळात बांधणी करण्यात आली. तेव्हापासून या तलावास पायातूनच गळती असल्याने ...

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची दुष्काळकाळात बांधणी करण्यात आली. तेव्हापासून या तलावास पायातूनच गळती असल्याने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पाणीसाठा संपुष्टात येत आहे. आजवर दोनवेळा गळती काढण्यात आली, मात्र गळती थांबवण्यात संबंधित लघुपाटबंधारे विभागाला यश आले नसल्याने तलाव असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

१९७२ च्या दुष्काळानंतर शासनाने ग्रामीण, डोंगरी विभागात जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी पाझर तलाव बांधणी करण्यास सुरुवात केली. या तलावांच्या माध्यमातून पाणी अडविण्यात येऊ लागले. याचदरम्यान १०८०-८१ ला बामणवाडी येथील पाझर तलाव बांधणी करण्यास आली. यावेळी शेतकऱ्यांनी तलाव झाल्यास पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, या आशेने चालू जमीन विनामोबदला तलावनिर्मितीसाठी दिल्या. मात्र, बांधणीपासून या तलावास गळती असल्याने पाणीसाठा जास्त काळ टिकून राहू शकला नाही. मात्र, आज ना उद्या तलाव दुरुस्ती केल्यानंतर आपले स्वप्न पूर्ण होतील, या आशेवर शेतकरी राहिला. मात्र अनेक शेतकरी स्वप्न सत्यात पाहण्याअगोदरच स्वर्गवासी झाले. मात्र, त्यांनी पाहिलेली स्वप्नं त्यांच्या नातवंडांनाही अजून प्रत्यक्ष अनुभवयास मिळाली नाहीत. २०१९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेत बामणवाडी समाविष्ट करण्यात आल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात पुन्हा या तलावाची गळती काढण्यात आली. यावेळी नवीन तंत्रज्ञान वापरून एचडीपी (प्लॅस्टिक )पेपरचा वापर करण्यात आला. यावेळी तलावाच्या भिंतीच्या आतील बाजूस चर खोदून हा पेपर टाकण्यात आला. यावेळी संबंधित ठेकेदाराकडून फाटका पेपर टाकण्यात आला. यावेळी संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी फाटका पेपर असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी पेपर चिकटवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, चिकटवला नसल्याचे बोलले जात आहे. गळती काढण्यात आल्यानंतर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. तलाव पूर्ण क्षमतेने भरला गेला. यावेळी तलावात पाणीसाठा टिकून राहील, या आशेने शेतकरी समाधानी झाला होता. मात्र जास्त वेळ समाधान टिकून राहिले नाही. तलाव पूर्ण क्षमतेने भरला तरीही नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण पाणीसाठा संपुष्टात येत आहे.

चौकट..

ठेकेदाराने केवळ चार दिवसांत काम उरकले...

तलावाची गळती काढण्यात यावी म्हणून स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे मागणी केली. मात्र, गळती काढण्यास निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने अनेक दिवस काम रेंगाळले गेले. त्यानंतर १५ मार्च २००१ ला लघुपाटबंधारे विभागाने तलाव दुरुस्तीकामी मंजुरी दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या नावे ६५ हजार रुपयांचे टेंडर काढण्यात आले. मात्र, ग्रामपंचायतीस कोणतीही माहिती न देता दुसऱ्या ठेकेदाराला काम देण्यात आले. या ठेकेदाराने शासनाचे नियम बासनात गुंडाळून चार दिवसांत काम पूर्ण केले. गळती काढल्यानंतर पहिल्यापेक्षा दुप्पट गळती वाढली. ती कायम तशीच राहिली.

चौकट :

गाळ काढल्यास बारमाही पाणीसाठा...

तलावाची गळती व गाळ काढल्यास बारमाही पाणीसाठा टिकून राहू शकतो. पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने या तलावाची रचना असल्याने विद्युतमोटरीशिवाय पाइपलाइन, पाटाद्वारे काही क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. या पाणीसाठ्यामुळे परिसरातील विहिरींना पाणी स्त्रोत वाढून उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईपासून मुक्ती मिळू शकते.