शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बामणवाडी तलाव असून अडचण नसून खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची दुष्काळकाळात बांधणी करण्यात आली. तेव्हापासून या तलावास पायातूनच गळती असल्याने ...

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची दुष्काळकाळात बांधणी करण्यात आली. तेव्हापासून या तलावास पायातूनच गळती असल्याने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पाणीसाठा संपुष्टात येत आहे. आजवर दोनवेळा गळती काढण्यात आली, मात्र गळती थांबवण्यात संबंधित लघुपाटबंधारे विभागाला यश आले नसल्याने तलाव असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

१९७२ च्या दुष्काळानंतर शासनाने ग्रामीण, डोंगरी विभागात जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी पाझर तलाव बांधणी करण्यास सुरुवात केली. या तलावांच्या माध्यमातून पाणी अडविण्यात येऊ लागले. याचदरम्यान १०८०-८१ ला बामणवाडी येथील पाझर तलाव बांधणी करण्यास आली. यावेळी शेतकऱ्यांनी तलाव झाल्यास पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, या आशेने चालू जमीन विनामोबदला तलावनिर्मितीसाठी दिल्या. मात्र, बांधणीपासून या तलावास गळती असल्याने पाणीसाठा जास्त काळ टिकून राहू शकला नाही. मात्र, आज ना उद्या तलाव दुरुस्ती केल्यानंतर आपले स्वप्न पूर्ण होतील, या आशेवर शेतकरी राहिला. मात्र अनेक शेतकरी स्वप्न सत्यात पाहण्याअगोदरच स्वर्गवासी झाले. मात्र, त्यांनी पाहिलेली स्वप्नं त्यांच्या नातवंडांनाही अजून प्रत्यक्ष अनुभवयास मिळाली नाहीत. २०१९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेत बामणवाडी समाविष्ट करण्यात आल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात पुन्हा या तलावाची गळती काढण्यात आली. यावेळी नवीन तंत्रज्ञान वापरून एचडीपी (प्लॅस्टिक )पेपरचा वापर करण्यात आला. यावेळी तलावाच्या भिंतीच्या आतील बाजूस चर खोदून हा पेपर टाकण्यात आला. यावेळी संबंधित ठेकेदाराकडून फाटका पेपर टाकण्यात आला. यावेळी संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी फाटका पेपर असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी पेपर चिकटवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, चिकटवला नसल्याचे बोलले जात आहे. गळती काढण्यात आल्यानंतर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. तलाव पूर्ण क्षमतेने भरला गेला. यावेळी तलावात पाणीसाठा टिकून राहील, या आशेने शेतकरी समाधानी झाला होता. मात्र जास्त वेळ समाधान टिकून राहिले नाही. तलाव पूर्ण क्षमतेने भरला तरीही नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण पाणीसाठा संपुष्टात येत आहे.

चौकट..

ठेकेदाराने केवळ चार दिवसांत काम उरकले...

तलावाची गळती काढण्यात यावी म्हणून स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे मागणी केली. मात्र, गळती काढण्यास निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने अनेक दिवस काम रेंगाळले गेले. त्यानंतर १५ मार्च २००१ ला लघुपाटबंधारे विभागाने तलाव दुरुस्तीकामी मंजुरी दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या नावे ६५ हजार रुपयांचे टेंडर काढण्यात आले. मात्र, ग्रामपंचायतीस कोणतीही माहिती न देता दुसऱ्या ठेकेदाराला काम देण्यात आले. या ठेकेदाराने शासनाचे नियम बासनात गुंडाळून चार दिवसांत काम पूर्ण केले. गळती काढल्यानंतर पहिल्यापेक्षा दुप्पट गळती वाढली. ती कायम तशीच राहिली.

चौकट :

गाळ काढल्यास बारमाही पाणीसाठा...

तलावाची गळती व गाळ काढल्यास बारमाही पाणीसाठा टिकून राहू शकतो. पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने या तलावाची रचना असल्याने विद्युतमोटरीशिवाय पाइपलाइन, पाटाद्वारे काही क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. या पाणीसाठ्यामुळे परिसरातील विहिरींना पाणी स्त्रोत वाढून उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईपासून मुक्ती मिळू शकते.