शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

वीर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील : नलावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:45 IST

शिरवळ : ‘खंडाळा तालुक्यातील वीर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, शासन निर्देशाप्रमाणे वीर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया ...

शिरवळ : ‘खंडाळा तालुक्यातील वीर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, शासन निर्देशाप्रमाणे वीर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया महिनाभरात सुरू करणार आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा पुनर्वसन उपजिल्हाधिकारी कीर्ती नलावडे यांनी केले.

सातारा येथील पुनर्वसन उपजिल्हाधिकारी कीर्ती नलावडे यांच्या कार्यालयात वीर धरणग्रस्त पुनर्वसन संघर्ष समितीचे पदाधिकारी व धरणग्रस्त शेतकऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या.

उपजिल्हाधिकारी कीर्ती नलावडे म्हणाल्या, ‘धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य करत हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारी संकलन सूची पुणे येथील पुनर्वसन विभागाकडे असल्याकारणाने त्या कार्यालयाकडून मागितली जाईल. ती प्राप्त होताच धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.’

यावेळी वीर धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत वेगवेगळ्या मागण्या बैठकीमध्ये मांडण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने धरणग्रस्तांना घरबांधणीसाठी दिलेले भूखंड, गावठाण नकाशा, निर्वाह भत्ता, त्याचप्रमाणे पर्यायी जमीन खंडाळा तालुक्यात देण्यासाठी, तसेच विविध मागण्यांबाबत चर्चा झाली.

नीरा उजवा कालवा प्रकल्पाचे अधिकारी विजय नलावडे म्हणाले, ‘धरणामधील जलाशयाची पाणीपातळी वेळोवेळी निश्चितविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून पुढील निर्णय घेतला.’

तहसीलदार विवेक जाधव, समितीच्या वतीने समन्वयक डॉ. विजय शिंदे, अध्यक्ष देवानंद चव्हाण, सचिव अजिंक्य चव्हाण, जयवंत चव्हाण, गणेश जाधव, विश्वास चव्हाण, विजय चव्हाण, विशाल गायकवाड, मधुकर कदम यांनी सहभाग घेतला. यावेळी तहसीलदार विवेक जाधव, समन्वयक डॉ. विजय शिंदे, अध्यक्ष देवानंद चव्हाण, सचिव अजिंक्य चव्हाण, भोळीचे सरपंच प्रशांत खुंटे, उपसरपंच महेश चव्हाण, भादे उपसरपंच विशाल गायकवाड, हरिश्चंद्र लिमण, विश्वास चव्हाण, जयवंत चव्हाण, गणेश भोसले, भास्कर कदम उपस्थित होते.

फोटो १७ वीर धरण

खंडाळा तालुक्यातील वीर धरणग्रस्तांच्या बैठकीप्रसंगी उपजिल्हाधिकारी कीर्ती नलावडे यांनी समस्या जाणून घेतल्या. यावेळी तहसीलदार विवेक जाधव उपस्थित होते. (छाया : मुराद पटेल)