शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

अनुशेषाचं भूत पवारांनीच आणलं : येळगावकर

By admin | Updated: August 31, 2015 23:28 IST

या योजनेतील मुख्य कालव्याची कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. दोन्ही काँगे्रस केवळ मोर्चाचं नाटक करीत आहेत.

सातारा : ‘मुख्यमंत्री असताना शरद पवारांनीच पाणी वाटपाच्या अनुशेषाचं भूत राज्याच्या मानगुटीवर बसविलं होतं. जिल्ह्यातील खटाव-माण तालुक्यांत दुष्काळाची विदारक स्थिती त्यांच्या धोरणामुळेच झाली आहे,’ असा जाहीर आरोप राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘महाराष्ट्राचे नेते म्हणवून घेणारे गेलेत कुठे? त्यांना जमेना म्हणून शरद पवारांना उतारवयात दुष्काळी भागाचे दौरे करावे लागत आहेत,’ अशी खरमरीत टीकाही त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली. येळगावकर म्हणाले, ‘राष्ट्रवादी व काँगे्रस हे दोन्ही पक्ष सत्तेवर असताना त्यांना जिल्ह्यातील दुष्काळी प्रश्न सुटला नाही. आता काही तरी करतो, हे दाखवायचं म्हणून हे दोन्ही पक्ष सरकारविरोधात मोर्चे काढत आहेत. उरमोडी धरणात सात ते आठ टीएमसी पाणी असूनही दुष्काळी स्थिती कायम आहे. या धरणातून सातारा, माण, खटाव तालुक्यांतील जमीन सिंचनाखाली आणण्याचे मुख्य उद्दिष्ट होते; मात्र अद्याप ते साध्य झालेले नाही. या योजनेतील मुख्य कालव्याची कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. दोन्ही काँगे्रस केवळ मोर्चाचं नाटक करीत आहेत.’ - आणखी वृत्त /२