शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

स्रेहसंमेलनातून कलागुणांना वाव बाल्यावस्थेतच

By admin | Updated: February 25, 2015 00:15 IST

कलेची आवड : संधी मिळवून देणारे व्यासपीठ, अनेकजण यशस्वी

कोपर्डे हवेली : विद्यार्थ्यांच्या जीवनाची सुरुवात शालेय जीवनापासून होते. त्यांच्यामध्ये अनेक सुप्त गुण असतात. त्यांचे कलागुण शोधण्याचे काम स्रेहसंमेलनाच्या माध्यमातून केले जाते. जानेवारी, फेबु्रवारी महिन्यांमध्ये विविध शाळा, विद्यालये, महाविद्यालयांची स्रेहसंमेलने आयोजित करण्यात येतात. यातून अनेक कलाकार आपली कला सादर करतात. अशा स्नेहसंमेलनातून आजपर्यंत मोठे कलाकार जन्माला येऊन त्यांना योग्य दिशाही मिळाली आहे. कला सादर करण्यासाठी स्रेहसंमेलनासारखे व्यासपीठ शाळेतून मिळत असते. विद्यार्थी वेगवेगळ्या कलेचे सादरीकरण करीत असताना त्यांच्याकडून गायन, वादन, नृत्य, लोकगीते, तबला, मुलाखती, नाट्य संवाद, एकांकिका, गोंधळी नृत्य पोवाडे, धनगरी ओव्या आदींसह इतर कलांचे सादरीकरण करण्यात येते. सध्याचे बहुतांश मोठे कलाकार त्यांच्या विद्यार्थी जीवनामध्ये स्रेहसंमेलनाच्या कार्यक्रमात आपली कला सादर होते. त्यातूनच त्यांना संधी मिळत गेली आणि ते यश शिखरावर पोहोचले. बाल्यावस्थेत विद्यार्थ्यांना कलेची आवड निर्माण होण्यास स्रेहसंमेलने महत्त्वाची ठरली आहेत. स्रेहसंमेलनामुळे धिटपणा, आत्मविश्वास, समय सुचकता आदी गोष्टींचा लाभ विद्यार्थ्यांना होत असतो. (वार्ताहर) युवा महोत्सवातून संधी काही महाविद्यालयांमध्ये ‘युवा महोत्सव’ आयोजित केले जातात. या महोत्सवांमध्ये युवक-युवतीही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या युवा महोत्सवातूनच साखळी पद्धतीने महाविद्यालयांतील कला पथकांची निवड होते. महाविद्यालयीन जीवनात आयोजित करणारे हे ‘युवा महोत्सव’ विद्यार्थ्यांसाठी पोषक वातावरण तयार करतात. शहरी विभागातील शाळांमध्ये एकांकिका स्पर्धेचे आयोेजन करून गुणवंत कलाकारांची निवड केली जाते. शालेय जीवनात सादर झालेली ही एकांकिका पुढे मोठा कलाकार जन्माला घालण्यास उपयुक्त ठरते. वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवर विद्यार्थ्यांच्या गाण्याच्या स्पर्धा तसेच इतर कार्यक्रम दाखविण्यात येत असल्याने त्या कार्यक्रमांतूनच बाल कलाकारांचा आत्मविश्वास वाढतो.