शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

लोणंद ते आदर्की फाटा मार्गासाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:37 IST

सातारा : लोणंद ते आदर्की फाटा मार्गाच्या कामासाठी १२.८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या मार्गाचे काम अपूर्णावस्थेत राहिल्याने ...

सातारा : लोणंद ते आदर्की फाटा मार्गाच्या कामासाठी १२.८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या मार्गाचे काम अपूर्णावस्थेत राहिल्याने त्याची मोठी दुरवस्था झाली होती. निधी मंजूर झाल्याने नागरिकांसाठी धोकादायक बनलेल्या या रस्त्याचे काम आता लवकर मार्गी लागणार असल्याने महामार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे. यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

सातारा लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या लोणंद ते सातारा महामार्गाची दुरुस्ती होण्याबाबत व हा मार्ग वाहतुकीस योग्य करण्यात यावा, अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग पुण्याचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करून वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डी वरील आदर्की फाटा ते वाढे फाटा १७/१४५ ते ४४/०० कि.मी.मध्ये रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.

याच मार्गावरील आदर्की फाटा ते लोणंदपर्यंतच्या मार्गाचे काम सुरू करण्यात आले नव्हते. परिणामी या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. सर्वाधिक वाहतुकीचा रस्ता अशी ओळख असलेल्या या मार्गाची दुरवस्था झाल्याने नागरिकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

खराब रस्त्यामुळे अपघातांच्या घटनांत वाढ झाल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे लोणंद परिसराच्या अनेक गावांतील ग्रामस्थांनी खा. श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन रस्ता दुरुस्तीच्या कामाची मागणी केली होती.

खा. श्रीनिवास पाटील यांनी यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन तशी सूचना केली होती, तर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनादेखील पत्र लिहून या कामासाठी निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनुसार भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून लोणंद ते आदर्की फाटा एकूण ०.०० ते १७/ १४५ कि.मी. लांबीच्या रस्ता मजबुतीकरण कामासाठी १२.८९ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया तातडीने हाती घेण्याची कार्यवाही या विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी खा. पाटील यांना पत्राद्वारे कळविली आहे. हा निधी मंजूर झाल्याने या खराब झालेल्या महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास जाणार असल्याने दळणवळणासाठी सोयीचे ठरणार आहे.