शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही ३३ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड कहर सुरू असून, गत दिवसांपासून बळींचा आकडा तीसच्या वर जाऊ लागला आहे. गत चोवीत ...

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड कहर सुरू असून, गत दिवसांपासून बळींचा आकडा तीसच्या वर जाऊ लागला आहे. गत चोवीत तासांत नवे १ हजार ४३४ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये तब्बल ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बळींची संख्या २ हजार ११४ वर पोहोचली असून, बाधितांचा आकडा ८१ हजार ७९६ इतका झाला आहे.

जिल्ह्यात विशेषत: एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत वेगाने वाढू लागली आहे. दीड हजारांच्या वर बाधितांचे आकडे जाऊ लागले आहेत, तर तीसहून अधिक जणांचा रोज मृत्यू होत आहे. ही जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. शनिवारी ३८ जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच रविवारी आणखी ३३ जणांचा कोरोनाने बळी घेतला. मृतांमध्ये कोलवडी, ता. कोरेगाव येथील ६८ वर्षीय महिला, वाठार स्टेशन, ता. कोरेगाव येथील ७२ वर्षीय पुरुष, केळघर, ता. जावळी येथील ७० वर्षीय महिला, आंबेघर, ता. जावळी येथील ६७ वर्षीय पुरुष, लोणंद, ता. खंडाळा येथील ६१ वर्षीय पुरुष, कांजूर भांडुप मुंबई येथील ६५ वर्षीय महिला, बुधवार पेठ फलटण येथील ६५ वर्षीय महिला, देगाव, ता. सातारा येथील ८५ वर्षीय महिला, लोणंद, ता. खंडाळा येथील ६५ वर्षीय पुरुष, जांभगाव निसराळे, ता. सातारा येथील ६४ वर्षीय पुरुष, कुंभारगाव, ता. पाटण येथील ६५ वर्षीय महिला, असवली, ता. खंडाळा येथील ७७ वर्षीय पुरुष, एकंबे, ता. कोरेगाव येथील ७६ वर्षीय महिला, पुसेगाव, ता. खटाव येथील ७९ वर्षीय पुरुष, पळशी, ता. कोरेगाव येथील ७० वर्षीय पुरुष, मोही, ता. माण येथील ६२ वर्षीय पुरुष, दाखणी, ता. माण येथील ७५ वर्षीय पुरुष, वाघजाईनगर, ता. वाई येथील ८५ वर्षीय महिला, पारखंडी, ता. वाई येथील ५८ वर्षीय महिला, पुणे येथील ८४ वर्षीय पुरुष, बावधन, ता. वाई येथील ८० वर्षीय पुरुष, धोरोशी, ता. पाटण येथील ६५ वर्षीय पुरुष, विसापूर, ता. खटाव येथील ६५ वर्षीय महिला, टाकेवाडी, ता. माण येथील ६५ वर्षीय महिला, आगाशिवनगर, ता. कऱ्हाड येथील ३७ वर्षीय पुरुष, खानापूर, ता. वाई येथील २७ वर्षीय पुरुष, खटाव येथील ८० वर्षीय पुरुष, वडूज, ता. खटाव येथील ६६ वर्षीय पुरुष, किन्हई, ता. सातारा येथील ६५ वर्षीय पुरुष, वडूज, ता. खटाव येथील ६६ वर्षीय महिला, महाबळेश्वर येथील ६० वर्षीय पुरुष , नांदलापूर, ता. कऱ्हाड येथील ८२ वर्षीय महिला, कऱ्हाड येथील ७६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

चाैकट : दिवसभरात ३४२ कोरोनामुक्त

जिल्ह्यात एकीकडे बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही वाढत आहे. रविवारी दिवसभरात ३४२ नागरिकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत ६६ हजार ९४८ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.