शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

अंधश्रद्धेपोटी बळी देण्यास अंनिसचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील वनवासवाडी येथील काळेश्वरी देवी मंदिर परिसरात करणी व जादूटोणा यांची भीती घालून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील वनवासवाडी येथील काळेश्वरी देवी मंदिर परिसरात करणी व जादूटोणा यांची भीती घालून पशुहत्येची तयारी सुरू असून प्रशासनाने ही पशुहत्या थांबवावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आलेली आहे.

अंनिसतर्फे देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कृष्णानगर (वनवासवाडी) येथील काळूबाई मंदिर परिसरात भरल्या जाणाऱ्या यात्रेच्या ठिकाणी दि. ३ मार्च रोजी पहाटेपासून श्री काळेश्वरी देवी मंदिरासमोर व परिसरात उघड्यावर हजारो जिवंत कोंबड्या बकऱ्यांची अंधश्रद्धेपोटी पशुहत्या करण्याची तयारी केली गेली आहे.

सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सर्वत्र यात्रा-जत्रा यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध आणलेले आहेत. या नियमांचे उघडपणे उल्लंघन करून श्री काळेश्वरी देवी मंदिर परिसर नाईक वीटभट्टी मागे कृष्णानगर, वनवासवाडी सातारा या ठिकाणी २२ फेब्रुवारी रोजी गुप्त बैठक घेण्यात आली. दि. २ व ३ मार्च रोजी मोठी यात्रा घेण्याचे नियोजन केले असल्याची माहिती मिळालेली आहे. दिनांक तीन मार्च रोजी पहाटेपासून मोठ्या प्रमाणात बकरे व कोंबडी यांचे बळी श्री काळेश्वरी देवी मंदिर परिसरात दिले जाणार आहेत. यासाठी भक्तांना मोठ्या प्रमाणात जेवणावळी दिले जाणार आहेत. ते पशुबळी विधी करण्यासाठी सुरी, सत्तूर, विळे, लाकडी ठोकळे, भांडी यांची जय्यत तयारी मंदिरामागे असलेल्या एका बंगल्याच्या परिसरात करण्यात आलेली आहे. येणाऱ्या भक्तांना यात्रेत करणी, जादूटोणा झाल्याची मानसिक भीती घालून त्यावर उपाय करण्यासाठी बकरे,कोंबड्यांचे बळी देण्यास प्रवृत्त केले जाते. अशा प्रकारे देवीचा नवस फेडण्यासाठी करणी घालवण्यासाठी उघड्यावर दिले जाणारे पशुबळी उच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ यामध्ये लक्ष घालून तीन मार्च रोजी होणारी पशुहत्या थांबवावी असे त्यांनी म्हटले आहे. अंनिसतर्फे देण्यात आलेल्या पत्रकावर डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, वंदना माने, हौसेराव धुमाळ त्यांच्या सह्या आहेत.

चौकट

भारतीय संविधानाने देव आणि धर्म पालनाचे स्वातंत्र्य सर्व नागरिकांना दिले आहे. याचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदर करते; परंतु देव आणि धर्माच्या नावाने सार्वजनिक ठिकाणी करणी व जादूटोणा यांची भीती घालून पशुबळी करायला लावणे याला विरोध आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यांमध्ये मांढर गडावर मोठ्या प्रमाणावर पशुहत्या होत होती. तेथे घडलेल्या मोठ्या दुर्घटनेमुळे अनेकांचे जीव गेले होते. याबाबत देखील अंनिसने स्पष्टीकरण केलेले आहे.

कोट