शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

ऐन दुष्काळातही साखरगाठींचा गोडवा!

By admin | Updated: April 7, 2016 23:49 IST

आज गुढीपाडवा : दरवाढ न करण्याचा व्यावसायिकांचा निर्णय

सातारा : दुष्काळामुळे सणांवर जणू संक्रांत आली आहे. माणसासह पशु-पक्ष्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. रोजगार नसल्यामुळे पैशांची चणचण आहे, अशा टंचाईच्या काळात शुक्रवारी गुढीपाडवा सण साजरा होत आहे. दुष्काळानं सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणलं असताना साखरगाठींचा दर न वाढविण्याचा निर्णय साताऱ्यातील काही व्यावसायिकांनी घेतला आहे. त्यामुळे दुष्काळातही साखरगाठींनी गोडवा वाढविल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. गुढीपाडव्यापासून मराठी वर्षारंभ होतो. हा दिवस सर्वत्र गुढ्या उभारून उत्साहाने साजरा केला जातो. गुढीला बांधल्या जाणाऱ्या साखरगाठींना या दिवशी मोठे महत्त्व असते. यंदा साखर आणि मजुरीचे दर वाढले आहेत. मात्र राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील काही व्यावसायिकांनी साखरगाठींचे दर न वाढविण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बाजारात सध्या रंगबेरंगी साखरगाठींची रेलचेल पाहायला मिळत आहे. साधारणपणे चार रंगांमध्ये तयार केलेल्या साखरगाठींना पसंती असल्याचे दिसत आहे. यामध्ये पिवळा, केशरी, गुलाबी आणि पांढरा या चार रंगांचा समावेश आहे. शिवाय बिस्कीट गाठी, पिंपळ पानाच्या आकारातील, चंपाकळी आकारातील गाठींचा समावेश आहे. साखरेच्या पाकापासून साखरगाठी बनविल्या जातात. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे महाशिवरात्रीपासूनच या कामाला सुरुवात केली जाते. दुष्काळामुळे आम्ही व्यावसायिकांनी साखरगाठींच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतल्याचे व्यावसायिक शेखर राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी) आकार, वजनावरून ठरते किंमत मागणीनुसार ५० ग्रॅमपासून ते ५ किलोपर्यंत वजनाच्या साखरगाठी बाजारात उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील काही हौशी ग्राहक आरसे, भिंग, रेबीन अशा वस्तूंनी शोभिवंत केलेल्या साखरगाठींची मागणी करत आहेत. तर देवळात लावण्यासाठी मोठ्या आकाराच्या साखरगाठींमध्ये देवदेवतांच्या मूर्तीचे छाप उमटविलेल्या गाठींनाही मोठी मागणी आहे. आकार, वजन आणि कलाकुसर यानुसार साखरगाठींचे वेगवेगळे दर आहेत. अगदी पंधरा रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत किमतीच्या साखरगाठी सध्या बाजारात विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत.