शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

ऐन दुष्काळातही साखरगाठींचा गोडवा!

By admin | Updated: April 7, 2016 23:49 IST

आज गुढीपाडवा : दरवाढ न करण्याचा व्यावसायिकांचा निर्णय

सातारा : दुष्काळामुळे सणांवर जणू संक्रांत आली आहे. माणसासह पशु-पक्ष्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. रोजगार नसल्यामुळे पैशांची चणचण आहे, अशा टंचाईच्या काळात शुक्रवारी गुढीपाडवा सण साजरा होत आहे. दुष्काळानं सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणलं असताना साखरगाठींचा दर न वाढविण्याचा निर्णय साताऱ्यातील काही व्यावसायिकांनी घेतला आहे. त्यामुळे दुष्काळातही साखरगाठींनी गोडवा वाढविल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. गुढीपाडव्यापासून मराठी वर्षारंभ होतो. हा दिवस सर्वत्र गुढ्या उभारून उत्साहाने साजरा केला जातो. गुढीला बांधल्या जाणाऱ्या साखरगाठींना या दिवशी मोठे महत्त्व असते. यंदा साखर आणि मजुरीचे दर वाढले आहेत. मात्र राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील काही व्यावसायिकांनी साखरगाठींचे दर न वाढविण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बाजारात सध्या रंगबेरंगी साखरगाठींची रेलचेल पाहायला मिळत आहे. साधारणपणे चार रंगांमध्ये तयार केलेल्या साखरगाठींना पसंती असल्याचे दिसत आहे. यामध्ये पिवळा, केशरी, गुलाबी आणि पांढरा या चार रंगांचा समावेश आहे. शिवाय बिस्कीट गाठी, पिंपळ पानाच्या आकारातील, चंपाकळी आकारातील गाठींचा समावेश आहे. साखरेच्या पाकापासून साखरगाठी बनविल्या जातात. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे महाशिवरात्रीपासूनच या कामाला सुरुवात केली जाते. दुष्काळामुळे आम्ही व्यावसायिकांनी साखरगाठींच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतल्याचे व्यावसायिक शेखर राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी) आकार, वजनावरून ठरते किंमत मागणीनुसार ५० ग्रॅमपासून ते ५ किलोपर्यंत वजनाच्या साखरगाठी बाजारात उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील काही हौशी ग्राहक आरसे, भिंग, रेबीन अशा वस्तूंनी शोभिवंत केलेल्या साखरगाठींची मागणी करत आहेत. तर देवळात लावण्यासाठी मोठ्या आकाराच्या साखरगाठींमध्ये देवदेवतांच्या मूर्तीचे छाप उमटविलेल्या गाठींनाही मोठी मागणी आहे. आकार, वजन आणि कलाकुसर यानुसार साखरगाठींचे वेगवेगळे दर आहेत. अगदी पंधरा रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत किमतीच्या साखरगाठी सध्या बाजारात विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत.