शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

ऐन दुष्काळातही साखरगाठींचा गोडवा!

By admin | Updated: April 7, 2016 23:49 IST

आज गुढीपाडवा : दरवाढ न करण्याचा व्यावसायिकांचा निर्णय

सातारा : दुष्काळामुळे सणांवर जणू संक्रांत आली आहे. माणसासह पशु-पक्ष्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. रोजगार नसल्यामुळे पैशांची चणचण आहे, अशा टंचाईच्या काळात शुक्रवारी गुढीपाडवा सण साजरा होत आहे. दुष्काळानं सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणलं असताना साखरगाठींचा दर न वाढविण्याचा निर्णय साताऱ्यातील काही व्यावसायिकांनी घेतला आहे. त्यामुळे दुष्काळातही साखरगाठींनी गोडवा वाढविल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. गुढीपाडव्यापासून मराठी वर्षारंभ होतो. हा दिवस सर्वत्र गुढ्या उभारून उत्साहाने साजरा केला जातो. गुढीला बांधल्या जाणाऱ्या साखरगाठींना या दिवशी मोठे महत्त्व असते. यंदा साखर आणि मजुरीचे दर वाढले आहेत. मात्र राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील काही व्यावसायिकांनी साखरगाठींचे दर न वाढविण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बाजारात सध्या रंगबेरंगी साखरगाठींची रेलचेल पाहायला मिळत आहे. साधारणपणे चार रंगांमध्ये तयार केलेल्या साखरगाठींना पसंती असल्याचे दिसत आहे. यामध्ये पिवळा, केशरी, गुलाबी आणि पांढरा या चार रंगांचा समावेश आहे. शिवाय बिस्कीट गाठी, पिंपळ पानाच्या आकारातील, चंपाकळी आकारातील गाठींचा समावेश आहे. साखरेच्या पाकापासून साखरगाठी बनविल्या जातात. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे महाशिवरात्रीपासूनच या कामाला सुरुवात केली जाते. दुष्काळामुळे आम्ही व्यावसायिकांनी साखरगाठींच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतल्याचे व्यावसायिक शेखर राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी) आकार, वजनावरून ठरते किंमत मागणीनुसार ५० ग्रॅमपासून ते ५ किलोपर्यंत वजनाच्या साखरगाठी बाजारात उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील काही हौशी ग्राहक आरसे, भिंग, रेबीन अशा वस्तूंनी शोभिवंत केलेल्या साखरगाठींची मागणी करत आहेत. तर देवळात लावण्यासाठी मोठ्या आकाराच्या साखरगाठींमध्ये देवदेवतांच्या मूर्तीचे छाप उमटविलेल्या गाठींनाही मोठी मागणी आहे. आकार, वजन आणि कलाकुसर यानुसार साखरगाठींचे वेगवेगळे दर आहेत. अगदी पंधरा रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत किमतीच्या साखरगाठी सध्या बाजारात विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत.