शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर निखळ निर्मितीचा आनंद, उद्योजिकांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:08 IST

सातारा : कोणी फिरत्या चाकावर मातीच्या भांड्यांना आकार देतंय, तर कोणी लाकडी लाटणी बनविण्यात व्यस्त आहे. माणदेशातल्या उद्योजिका महिला महोत्सवाच्या निमित्ताने साताºयात येऊन निखळ निर्मितीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.माणदेशी फांउडेशनच्या वतीने गुरुवारपासून सातारा येथे जिल्हा परिषदेच्या मैदानावर माणदेशी महोत्सव भरला आहे. या महोत्सवासाठी माणदेशातल्या महिला भगिनी स्वनिर्मित वस्तू घेऊन ...

ठळक मुद्देमहोत्सवातील एका स्टॉलमध्ये एक महिला उद्योजिका स्वत: लाकडापासून लाटणे बनवित होती. हैद्राबाद, काश्मीर येथूनही मोठ्या प्रमाणावर स्टॉल म्हसवड येथील भारत कुंभार यांच्या स्टॉलमध्ये मातीची चूल पाहायला मिळत होती.

सातारा : कोणी फिरत्या चाकावर मातीच्या भांड्यांना आकार देतंय, तर कोणी लाकडी लाटणी बनविण्यात व्यस्त आहे. माणदेशातल्या उद्योजिका महिला महोत्सवाच्या निमित्ताने साताºयात येऊन निखळ निर्मितीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.

माणदेशी फांउडेशनच्या वतीने गुरुवारपासून सातारा येथे जिल्हा परिषदेच्या मैदानावर माणदेशी महोत्सव भरला आहे. या महोत्सवासाठी माणदेशातल्या महिला भगिनी स्वनिर्मित वस्तू घेऊन आल्या आहेत. त्यामध्ये लाटणे, पळपूट, मातीच्या चुली, मातीची भांडी, तवे, जाती, कढया अशा वस्तू आहेत. गेल्या सात वर्षांपूर्वी महोत्सवाला सुरुवात झाली तेव्हा माणदेशी घोंगडी व इतर गृहउद्योगातील वस्तू पाहायला मिळत होत्या.

यंदाच्या महोत्सवात चक्क माणदेशातील भाजीचे स्टॉलही आले आहेत. म्हसवडला माणदेशी फांउडेशनच्या माध्यमातून माणगंगा नदीवर मोठा बंधारा बांधला आहे. या बंधाºयामुळे नदीचे पाणी अडले तसेच आजूबाजूच्या विहिरींनाही मोठ्या प्रमाणात पाणी लागले. त्यामुळे हंगामी पिके घेणारे शेतकरी आता बागायती पिकांकडे वळले आहेत. म्हसवड येथील शेतकरी विजय लिंगे सांगत होते. १२ एकरांत आता बागायत होती. वांगी, भेंडी, मेथीची भाजी घेऊन ते महोत्सवात सहभागी झाले होते.

या महोत्सवात केवळ माणदेश व साताºयातील महिलांचे स्टॉल नाहीत तर हैद्राबाद, काश्मीर येथूनही मोठ्या प्रमाणावर स्टॉल आले आहेत. पहिल्याच दिवशी या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला. लोक उत्सुकतेने माहिती घेताना पाहायला मिळत होते. 

कोंबड्यांचा खुराडा  -वडूजचे संतोष जाधव हे बांबूपासून बनविलेल्या वस्तू घेऊन आले आहेत. टोपली, फुलदाणी, सूप यासोबतच त्यांनी आणलेला कोंबड्यांचा खुराडाही लक्ष वेधत आहे.म्हसवडातही पिकतंय आता माळवं--म्हसवडात पूर्वी पाण्याअभावी बागायती पिके मर्यादित स्वरुपात घेतली जात होती. आता मात्र पश्चिम भागाप्रमाणेच या परिसरात बागायत पिके घेतली जात असून, त्याची विक्री महोत्सवात केली जात आहे.मातीची चूल अन् भांडी--म्हसवड येथील भारत कुंभार मातीची भांडी घेऊन महोत्सवात दाखल झाले आहेत. मातीची भाजलेली चूल, मडकी, विविध भांडी, दही ठेवण्याचे भांडे, भाजीची भांडी त्यांनी आणली आहेत