शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

काळाने आधीच दिला होता इशारा!

By admin | Updated: September 9, 2014 23:43 IST

इमारत धोकादायक : पालिकेची नोटीस गंभीरपणे न घेतल्याने तिघांचा बळी

सातारा : राजपथावरील सुमारे १०५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ इमारतीचा काही भाग कोसळला होता. जणू पुढे होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेचा इशाराच मागील महिन्यातील तुफान पावसात मिळाला होता. यानंतर पालिकेने इमारत मालकाला नोटीसही दिली होती. या नोटिसीनंतर जर तत्काळ घराच्या भिंती उतरविल्या असत्या तर जीवितहानी टळली असती. शहरात अशा ११८ इमारती धोकादायकरित्या उभ्या आहेत. जीव गेल्यावरच इमारत पाडायची, हा एकमेव ‘अजेंडा’ शहरात पाहायला मिळत आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारती उतरवून घेण्याबाबत पालिका इमारत मालकांना नोटीस दिली जाते. सोमवारी अनंत चतुर्दशीदिवशी राजपथावरील १४८, भवानी पेठ या इमारतीची भली मोठी भिंत कोसळून तीन जणांना प्राण गमवावे लागले. धोकादायक इमारतींपासून मोठा अनर्थ घडू शकतो, याबाबत संबंधितांना गांभीर्यच नसल्याचे या दुर्घटनेने स्पष्ट झाले आहे. दरम्यान, २० आॅगस्ट रोजी सातारा शहरात तुफान पाऊस कोसळला होता. या पावसामध्ये या इमारतीचा काही भाग कोसळला होता. उर्वरित भाग कोसळण्याच्या मार्गावर होता. पालिकेने दिलेल्या नोटीसीनंतर संबंधित घरमालकाने इमारतीवरील पत्रे काढले होते. त्यामुळे घराच्या भिंती पावसाच्या पाण्याने भिजत होत्या. या भिजलेल्या भिंती धोकादायक बनल्या. अनंत चतुर्दशीला निमित्त झाले अन घराची भलीमोठी भिंत कोसळून तिघे गाडले गेले. शहरातील बहुतांश धोकादायक इमारतींबाबत वादाचे विषय आहेत. कोर्टाचा ‘स्टे’ आहे, असे कारण पुढे करुन इमारत उतरविण्यात टाळाटाळ केली जाते. मात्र, अशा इमारतीशेजारी राहणारे लोक जीव मुठीत घेऊन वावरतात. लोकांच्या जिवाला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन अशा इमारती पाडणे आवश्यक बनले आहे. पालिकेने याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)