शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

काळाने आधीच दिला होता इशारा!

By admin | Updated: September 9, 2014 23:43 IST

इमारत धोकादायक : पालिकेची नोटीस गंभीरपणे न घेतल्याने तिघांचा बळी

सातारा : राजपथावरील सुमारे १०५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ इमारतीचा काही भाग कोसळला होता. जणू पुढे होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेचा इशाराच मागील महिन्यातील तुफान पावसात मिळाला होता. यानंतर पालिकेने इमारत मालकाला नोटीसही दिली होती. या नोटिसीनंतर जर तत्काळ घराच्या भिंती उतरविल्या असत्या तर जीवितहानी टळली असती. शहरात अशा ११८ इमारती धोकादायकरित्या उभ्या आहेत. जीव गेल्यावरच इमारत पाडायची, हा एकमेव ‘अजेंडा’ शहरात पाहायला मिळत आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारती उतरवून घेण्याबाबत पालिका इमारत मालकांना नोटीस दिली जाते. सोमवारी अनंत चतुर्दशीदिवशी राजपथावरील १४८, भवानी पेठ या इमारतीची भली मोठी भिंत कोसळून तीन जणांना प्राण गमवावे लागले. धोकादायक इमारतींपासून मोठा अनर्थ घडू शकतो, याबाबत संबंधितांना गांभीर्यच नसल्याचे या दुर्घटनेने स्पष्ट झाले आहे. दरम्यान, २० आॅगस्ट रोजी सातारा शहरात तुफान पाऊस कोसळला होता. या पावसामध्ये या इमारतीचा काही भाग कोसळला होता. उर्वरित भाग कोसळण्याच्या मार्गावर होता. पालिकेने दिलेल्या नोटीसीनंतर संबंधित घरमालकाने इमारतीवरील पत्रे काढले होते. त्यामुळे घराच्या भिंती पावसाच्या पाण्याने भिजत होत्या. या भिजलेल्या भिंती धोकादायक बनल्या. अनंत चतुर्दशीला निमित्त झाले अन घराची भलीमोठी भिंत कोसळून तिघे गाडले गेले. शहरातील बहुतांश धोकादायक इमारतींबाबत वादाचे विषय आहेत. कोर्टाचा ‘स्टे’ आहे, असे कारण पुढे करुन इमारत उतरविण्यात टाळाटाळ केली जाते. मात्र, अशा इमारतीशेजारी राहणारे लोक जीव मुठीत घेऊन वावरतात. लोकांच्या जिवाला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन अशा इमारती पाडणे आवश्यक बनले आहे. पालिकेने याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)