शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटना रस्त्यावर उतरणार

By admin | Updated: November 5, 2015 23:56 IST

अशोकराव थोरात : पाच टप्प्यांत आंदोलनाचा इशारा

मलकापूर : ‘गेली दहा वर्षे शासन शिक्षण क्षेत्राकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष करीत आहे. अनेक प्रश्न प्रलंबित असताना धोरणात्मक निर्णय घेण्याऐवजी शिक्षण व्यवस्था अस्थिर करण्याचेच निर्णय घेत आहेत. त्यामुळे या विभागातील सर्व घटकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. त्यानुसार ७ नोव्हेंबर पासून सर्व घटकांच्या वतीने ५ टप्प्यात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’ असे मत शिक्षण संस्था महामंडळाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महामंडळाचे सचिव एस. टी. सुकरे उपस्थित होते. थोरात म्हणाले, ‘शासनाने २००४ पासून शाळांना कोणतेही अनुदान दिलेले नाही. त्यामुळे दैनंदिन खर्च करणेही अशक्य झाले आहे. त्याचबरोबर २८ आॅगस्टचा संच मान्यतेचा शासन निर्णयाने शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. ४ टप्प्यातील आंदोलनाने सरकारचे डोळे उघडले नाहीत तर मात्र ५ व्या टप्प्यात जानेवारीपासून राज्यभर बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.’ (प्रतिनिधी) समिती स्थापन शिक्षण क्षेत्रातील अडचणींवर एकत्रित लढा देण्यासाठी शिक्षण बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळासह माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघ, कला आध्यापक, क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ यांच्यासह शिक्षण विभागातील सर्व संघटनांचा समावेश केला आहे. आंदोलनाचे टप्पे शनिवार, दि. ७ दुपारी दोन ते पाच यावेळेत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद, दि. १४ रोजी रात्री दहा ते अकरा स्थानिक लोकप्रतिनिधींची झोपमोड आंदोलन, दि. ३० सकाळी अकरा वाजता शिक्षण संचालक कार्यालयापासून ते आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा, दि. ९ व १० रोजी लाक्षणीक शाळाबंद आंदोलन व त्याच दिवशी नागपूर हिवाळी अधिवेशन भव्य मोर्चा, जानेवारीत बेमुदत शाळा बंद आंदोलन संघटनेच्या प्रमुख मागण्या २८ आॅगस्टचा संच मान्यतेचा शासननिर्णय रद्द करा, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा अहवाल त्वरित मान्य करा, खासगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम ठेवा, कला व क्रीडा शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणुकीस मान्यता द्या, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी जुुनी पेन्शन योजना लागू करा, प्राथमिक शाळेत लिपिक व सेवकांची पदे मान्य करा, शालेय पोषण आहार यंत्रणा स्वतंत्र राबवा. शाळाबाह्य कामे बंद करा, अनुदानास पात्र शाळा, महाविद्यालयांच्या तुकड्यांना अनुदान द्या, २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क रकमेचा परतावा द्या, केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान व शिक्षकांना वेतन द्या. अशा प्रमुख अकरा मागण्या समितीच्या वतीने केल्या आहेत.