शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

कोरोनाकाळात कृषी उत्पन्नामुळे अर्थव्यवस्था टिकून : शंभूराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

रामापूर : ‘कोरोनाकाळामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये केवळ शेतकरी आणि कृषी विभागामुळे कृषी उत्पन्नात वाढ झाल्याने राज्याची व देशाची ...

रामापूर : ‘कोरोनाकाळामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये केवळ शेतकरी आणि कृषी विभागामुळे कृषी उत्पन्नात वाढ झाल्याने राज्याची व देशाची अर्थव्यवस्था टिकून राहिली,’ असा विश्वास राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत नवारस्ता (ता. पाटण) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री देसाई म्हणाले, ‘शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात असून, या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना योजना समजावून सांगाव्यात आणि त्यांना योजनांमध्ये समाविष्ट करून घ्यावे.’

या वेळी देसाई यांच्या हस्ते तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि कृषी विभागामार्फत बियाणे व युरिया ब्रिकेट्सचे वाटप करण्यात आले.

या मेळाव्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पाटील, सरपंच विष्णू पवार आदी पदाधिकारी, कृषी विज्ञान केंद्र कालवडेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. भरत खांडेकर, तंत्र अधिकारी दत्तात्रय खरात, तालुका कृषी अधिकारी सुनील ताकटे, मंडळ कृषी अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

कृषी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व परिसरातील शेतकऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.