शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कोरोनाकाळात कृषी उत्पन्नामुळे अर्थव्यवस्था टिकून : शंभूराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

रामापूर : ‘कोरोनाकाळामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये केवळ शेतकरी आणि कृषी विभागामुळे कृषी उत्पन्नात वाढ झाल्याने राज्याची व देशाची ...

रामापूर : ‘कोरोनाकाळामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये केवळ शेतकरी आणि कृषी विभागामुळे कृषी उत्पन्नात वाढ झाल्याने राज्याची व देशाची अर्थव्यवस्था टिकून राहिली,’ असा विश्वास राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत नवारस्ता (ता. पाटण) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री देसाई म्हणाले, ‘शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात असून, या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना योजना समजावून सांगाव्यात आणि त्यांना योजनांमध्ये समाविष्ट करून घ्यावे.’

या वेळी देसाई यांच्या हस्ते तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि कृषी विभागामार्फत बियाणे व युरिया ब्रिकेट्सचे वाटप करण्यात आले.

या मेळाव्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पाटील, सरपंच विष्णू पवार आदी पदाधिकारी, कृषी विज्ञान केंद्र कालवडेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. भरत खांडेकर, तंत्र अधिकारी दत्तात्रय खरात, तालुका कृषी अधिकारी सुनील ताकटे, मंडळ कृषी अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

कृषी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व परिसरातील शेतकऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.