शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:42 IST

सातारा : शिरवळ येथील औद्योगिक वसाहतींमध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा या मागणीसाठी स्थानिक भूमिपुत्रांनी पुकारलेला चड्डी-बनियान मोर्चा काढून ...

सातारा : शिरवळ येथील औद्योगिक वसाहतींमध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा या मागणीसाठी स्थानिक भूमिपुत्रांनी पुकारलेला चड्डी-बनियान मोर्चा काढून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २७ जानेवारी रोजी बैठक घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

खंडाळा तालुक्यात एकूण ४५३ कंपन्या असून, या कंपन्या स्थानिकांना डावलून बाहेरील युवकांना प्राधान्य देतात. कायम असलेल्या कामगारांना कामावरून काढून टाकणे, कामगारांना नोकरीत कायम न करणे, कंपनीचे रुजू पत्र न देता कामगारांना ठेकेदाराच्या फर्मचे पत्र देणे, यामुळे खंडाळा व शिरवळ या परिसरात बेरोजगारी वाढली आहे. काही ग्रामपंचायत सदस्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे येथील शांततेला गालबोट लागत असल्याची तक्रार भूमिपुत्रांची आहे. या आंदोलकांनी बुधवारी दुपारी भरउन्हात ठिय्या मारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान, या प्रश्नात शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी यशस्वी शिष्टाई केली. त्यांनी कामगारांची गुरुवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आंदोलकांशी चर्चा घडवून आणली. सिंह यांनी कामगारांचा प्रश्न समजावून घेतला. आता दि. २७ जानेवारी रोजी कामगार आयुक्त, कंपन्यांचे मालक आणि आंदोलक कामगार यांच्यात एकत्रित चर्चा घडवून तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.