शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

रस्त्यांवर पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:13 IST

खासदार श्रीनिवास पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात रस्ते अपघातांच्या घटनात दरवर्षी १२ हजार पेक्षा जास्त नागरिकांचा ...

खासदार श्रीनिवास पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात रस्ते अपघातांच्या घटनात दरवर्षी १२ हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू होतो. तर अनेकजण गंभीर जखमी होत असतात. राज्य सरकार राज्यातील रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. सर्व रस्ते दुर्घटनांपैकी ६० टक्क्यांहून अधिक लोक पादचारी व दुचाकीस्वार अशा असुरक्षित रस्ते वापरकर्त्यांपैकी असल्याचे आढळून येते. शिवाय क्रॅश डेटा विश्लेषणावरून असे दिसून येते की, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांवर रात्रीच्या सुमारास चौकांच्या ठिकाणी अनेक प्राणघातक अपघात होत आहेत. याचे मुख्य कारण त्याठिकाणी असलेली अपुरी प्रकाश व्यवस्था ही होय. त्यामुळे असे होणारे अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चौक परिसरात योग्य प्रकाश ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्यावेळी अंधार असेल तेव्हा हायमास्ट दिवे लावण्यात यावेत. तसेच वीज शुल्क आणि नियमित देखभाल दुरुस्तीची देखील तरतूद करून असे हायमास्ट पोल स्थापित करणे गरजेचे आहे. स्थानिक ग्रामपंचायती व छोट्या नगरपरिषद ह्या अशा सुविधा बसविण्यासाठी व देखभाल करण्यासाठी आर्थिक सुस्थितीत नाहीत. तर वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या कामासाठी विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा. याशिवाय एनएचएआयला त्यानुसार काम पार पाडण्यासाठी सूचना कराव्यात अशी मागणी केली आहे.