शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

रोपवनात म्हशी चारणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:47 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील वनहद्दीतील रोपवनातील गवतात विनापरवाना म्हशी चरायला सोडल्याप्रकरणी वनविभागाच्यावतीने तिघांकडून १२०० रुपये दंड वसूल ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील वनहद्दीतील रोपवनातील गवतात विनापरवाना म्हशी चरायला सोडल्याप्रकरणी वनविभागाच्यावतीने तिघांकडून १२०० रुपये दंड वसूल केला आहे.

पवारवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. योग्यप्रकारे निगा राखली जात असल्याने झाडांची चांगल्या पद्धतीने वाढ सुरू आहे. कोवळ्या रोपांना जनावरांपासून इजा पोहोचू नये, यासाठी वनहद्दीत चराईबंदी व कुऱ्हाडबंदी लागू करण्यात आली आहे. वनविभागाच्या या आदेशाचे उल्लंघन करून काही पशुपालक विनापरवाना रोपवनात जनावरे चरण्यासाठी सोडत आहेत. रोपांच्या अस्तित्वासाठी वनविभागाने गेल्या पंधरा दिवसांत रोपवनात जनावरे चरावयास सोडलेल्या तिघांवर रहिमतपूरचे वनपाल अनिल देशमुख यांनी दंडात्मक कारवाई केली. प्रतिम्हैस दोनशे रुपये याप्रमाणे सहा जनावरे सोडल्याप्रकरणी पवारवाडी येथील संबंधित तीन शेतकऱ्यांकडून बाराशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. रोपवनात जनावरे सोडल्यास रोपांना जनावरे शिंगाने घासतात व तुडवतात त्यामुळे रोपांची वाढ थांबून त्यांना इजा पोहोचते. यामुळे शासनाचे ध्येय साध्य होत नाही. कारवाईपूर्वी अनेक शेतकऱ्यांना वारंवार समज देण्यात आली होती तरीही सूचनांकडे दुर्लक्ष करून जनावरे सोडल्याने नाईलाजास्तव दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या जनावरांना पुरेसे गवत उपलब्ध व्हावे, यासाठी वनविभागाच्यावतीने वनहद्दीतील गवत कापून नेण्यास पशुपालक शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली असल्याची माहिती वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी दिली.