शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

मायणी ग्रामपंचायतीकडून तीन विहिरी अधिग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:26 IST

मायणी : मायणी गावास येरळवाडी मध्यम प्रकल्पातून असलेल्या प्रादेशिक योजनेचा वीजपुरवठा थकीत वीजबिलामुळे खंडित झाल्याने गावातील उपनगरांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई ...

मायणी : मायणी गावास येरळवाडी मध्यम प्रकल्पातून असलेल्या प्रादेशिक योजनेचा वीजपुरवठा थकीत वीजबिलामुळे खंडित झाल्याने गावातील उपनगरांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती, ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत तीन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून, या विहिरीतून उपनगरांना पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र शेती वीज वेळापत्रक पत्रकानुसार वीजपुरवठा काही दिवस रात्री व काही दिवस दिवसा असल्याने थोड्याफार अडचणी येत आहेत.

मायणी गावास पाणीपुरवठा करण्यासाठी येरळवाडी मध्यम प्रकल्पातून मायणी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र, या योजनेचे प्रचंड वीजबिल येत असल्याने या योजनेची थकबाकी तीन कोटींवर गेली आहे. वीजवितरण कंपनीने या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा वीजपुरवठा थकीत बिलाचे कारण दाखवून बंद केला.

त्यामुळे मायणी गावातील वडूज रोड, मरडवाक रोड, नदाफ कॉलनी, विघ्नहर्ता कॉलनी, श्रीराम कॉलनी, मोराळे रोड, यशवंतनगर, शिक्षक कॉलनी, सराटे मळा यांसह कचरेवाडी व फुलेनगर परिसरातील उपनगरामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना पिण्यासाठी तसेच रोजच्या वापरण्यासाठी ऐन पावसाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. ऐन पावसाळ्यामध्ये पाणी ग्रामस्थांना देता येत नसल्याने ग्रामपंचायतीवर ही थोडी नामुष्की ओढवली होती.

यावर मार्ग काढण्यासाठी मायणी ग्रामपंचायतीमार्फत येथील मरडवाक रोडलगत असलेले शेतकरी पांडुरंग झगडे, जालिंदर माळी व राजाराम कचरे यांच्या स्वमालकीच्या विहिरी गावाला पिण्याचे पाणी देण्यासाठी अधिग्रहण केल्या. या विहिरीतून पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीजवळ पाईपलाईन जोडून यातून या उपनगरांना पाणी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे पाणी देत असताना विहिरीवरील वीज शेतीपंपाची असल्याने आठवड्यातील काही दिवस रात्रीच्या वेळी वीजपुरवठा असतो, तर काही दिवस दिवसा वीजपुरवठा असतो, त्यामुळे पाणी देण्याचे वेळापत्रक बसवताना ग्रामपंचायतीला प्रचंड अडचण निर्माण होत आहे.

चौकट..

सुरळीत पाणीपुरवठा केल्याने संकट टळले..

विहिरीतून थेट पाणी पाईपलाईनद्वारे दिले जात असल्याने पुरेसा दाब नसल्याने संपूर्ण उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, ग्रामपंचायतीने प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद असतानाही ग्रामस्थांची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून अशा प्रकारे तातडीने निर्णय घेऊन पाणीपुरवठा सुरळीत केल्यामुळे ग्रामस्थांचे तूर्तास पाणीसंकट टळले आहे.

चौकट -

शेतकऱ्यांकडून विनामोबदला पाणीपुरवठा

प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे येथील पांडुरंग झगडे, जालिंदर माळी व राजाराम कचरे यांनी स्वमालकीच्या विहिरीतील विनामोबदला ग्रामपंचायतीस पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्व ग्रामस्थांकडून यांचे कौतुक होत आहे.