शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

ऊस तोडणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:58 IST

व्हीआयपीचे निदर्शने आंदोलन सातारा : कोरोना काळात सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. मुद्रा योजनेतील कर्जधारकांचे सर्व कर्ज माफ करण्यात ...

व्हीआयपीचे निदर्शने आंदोलन

सातारा : कोरोना काळात सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. मुद्रा योजनेतील कर्जधारकांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी विश्व इंडियन पार्टी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

नदीपात्रात घाण पाणी

सातारा : लोंब गोवे परिसरात कृष्णा नदीच्या पाण्यात मळीसदृश रसायन मिसळल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. तेथे मासे पकडण्यासाठी लोकांनी गर्दी केली. गुरुवारी सकाळच्या सुमारास कृष्णा नदीच्या पाण्यात मळीसदृश रसायन मिसळल्याने नदीच्या पाण्याला तवंग आला होता.

कारवाईची मागणी

सातारा : एसटीमध्ये डिझेल भरलेले असल्याने सिगारेट, बिडीच्या थोटकांमुळे आग लागून अनर्थ घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या परिसरामध्ये धूम्रपान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी बसेसना आग लागल्याची घटना घडली होती.

प्रवाशांमध्ये समाधान

मायणी : मायणी बसस्थानक परिसरातील रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक दिवसांपासून बसस्थानकात एसटी जात नव्हत्या. रस्त्याचे काम पूर्ण होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ होती. तसेच कोरोनामुळे काही गावांमध्ये एसटी पोहोचत नव्हत्या. मात्र, आता एसटीच्या फेऱ्या वाढविल्या आहेत.

एसटी फेऱ्या वाढवा

फलटण : शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने फलटण तालुक्यात एसटीला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. या गर्दीमुळे काही विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, ही गैरसोय थांबविण्यासाठी फलटण आगाराने एसटीच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.

वीज चोरीत वाढ

सातारा : खटाव तालुक्यातील लाडेगाव येथे वीजवितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर वीज चोरी सुरू आहे. या वीज चोरीला कारणीभूत असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य ग्राहकांतून होत आहे.

रस्त्याची चाळण

सातारा : सातारा नगरपालिकेच्या हद्दीवाढीत समावेश होऊनही शाहूपुरीकर अद्यापही विकासकामांपासून वंचित आहेत. गेंडामाळ नाका ते शाहूपुरी चौक या रस्त्याची चाळण झाली आहे. या मार्गावर रस्ता शोधताना वाहनचालकांची परवड होत

आहे.

अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी..

सातारा : सातारा शहरातील राजवाडा परिसरातील चौकांमध्ये अवजड वाहतुकीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील बहुतांश अंतर्गत रस्ते अरुंद असून, वाहनांची संख्या मात्र भरमसाठ वाढत आहे. राजवाडा परिसरात ग्रामीण भागातील दळणवळण जास्त असून, दुकानांची संख्या जास्त आहे. तसेच जुन्या इमारती असल्याने रस्ता रुंदीकरणाला वाव नाही. त्यातच या परिसातील दुकांनामध्ये माल घेऊन येणारी वाहने रस्त्यावर उभी करून माल उतरविला जातो.