शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सातारकरांना पुढच्या वर्षी मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

सातारा : नवीन कास धरण हा सातारा पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धरणाचे काम ...

सातारा : नवीन कास धरण हा सातारा पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धरणाचे काम गतीने सुरू आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्णत्वास येईल व सातारकरांना मुबलक पाणी मिळेल,’ असा विश्वास नगराध्यक्षा माधवी कदम यांनी व्यक्त केला.

सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची मंगळवारी सकाळी पालिकेकडून परंपरेनुसार ओटी भरण्यात आली. या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, नियोजन सभापती स्नेहा नलवडे, नगरसेविका स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, राम हादगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नगराध्यक्षा म्हणाल्या, ‘कास तलाव यंदा पंधरा दिवस अगोदरच तुडुंब भरला. त्यामुळे सातारकरांची पाणीटंचाईच्या संकटातून सुटका झाली. नवीन कास धरणाचे काम पावसाळ्यामुळे बंद आहे. पाऊस उघडताच हे काम पुन्हा गतीने सुरू होईल. धरण मार्गी लागल्यानंतर त्यात सध्याच्या तुलनेत पाचपट पाणीसाठा वाढणार आहे. त्यामुळे सातारकरांना पालिकेकडून मुबलक पाणीपुरवठा केला जाईल. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी कास धरणाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करून खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धरणाचे काम वेळेत मार्गी लावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

(चौकट)

पाणीकपात न केल्याचे समाधान : सीता हादगे

दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की पालिकेला पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागतो. यंदा पाणीपुरवठा विभागाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे नागरिकांवर पाणीकपातीचे संकट ओढावले नाही, याचे समाधान वाटत आहे. सांबरवाडी तसेच शहापूर येथील जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता केली असून, नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असला तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी केले.

फोटो : ०६ कास तलाव

सातारा पालिकेकडून मंगळवारी कास तलावाची ओटी भरण्यात आली. या वेळी माधवी कदम, सीता हादगे, स्नेहा नलवडे, स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक आदी उपस्थित होते. (छाया : जावेद खान)