शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

बायोमायनिंग प्रकल्पाबाबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा पालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पाबाबत राजू गोरे यांनी नोंदविलेल्या तक्रारीवर मंगळवारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा पालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पाबाबत राजू गोरे यांनी नोंदविलेल्या तक्रारीवर मंगळवारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी यांच्या दालनात सुनावणी झाली. गोरे यांनी प्रकल्पातील चुकीच्या कामांचे सक्षम पुरावे उपजिल्हाधिकाऱ्यांपुढे सादर केले, तर हा प्रकल्प नियमानुसार असल्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय गोरे यांनी घेतला आहे.

सातारा पालिकेच्या वतीने सोनगाव कचरा डेपोत उभारण्यात आलेल्या बायोमायनिंग प्रकल्पामध्ये तब्बल साडेतीन कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ‘नविआ’च्या नगरसेविका लीना गोरे यांचे पती राजू गोरे यांनी केला होता, तसेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी नगरपरिषद संचालनालयासह जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार अर्जाद्वारे केली होती. या तक्रारीवर उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांच्या दालनात मंगळवारी दुपारी बारा वाजता सुनावणी झाली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे, नगरसेवक अविनाश कदम, राजू भोसले आदी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी राजू गोरे यांनी प्रकल्पातील चुकीच्या कामांचा पाढा वाचला. प्रकल्पाचे टप्पे, निविदा प्रक्रिया, सक्षम प्राधिकाऱ्याची चुकीच्या पद्धतीने केलेली नियुक्ती, आजवर काढण्यात आलेली बिले याबाबतचे सक्षम पुरावे गोरे यांनी सादर केले, तर मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी प्रकल्पाचे काम नियमांना धरून सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अविनाश कदम, राजू गोरे यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.