शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

१९ ग्रामपंचायतींसाठी ८५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:43 IST

वाई : वाई तालुक्यातील १९ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असून, १५ जानेवारी रोजी ५७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. वाई तालुक्यात ...

वाई : वाई तालुक्यातील १९ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असून, १५ जानेवारी रोजी ५७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. वाई तालुक्यात सरासरी ८५ टक्के मतदान झाले. यामध्ये १४९ मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, नायब तहसीलदार गीतांजली गरड यांनी योग्य सूचना दिल्याने पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यातील संवेदनशील ग्रामपंचायतींत मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबईतील चाकरमान्यांना मतदानासाठी सहज येता यावे यासाठी खास वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. वाई तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन स्थानिक गावपुढारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गावकी व भावकी व घराघरातील नातेसंबंधामध्ये कटुता येऊ नये व गावाची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी १९ ग्रामपंचायती बिनविरोध केल्या. ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी १४९ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. वाई तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी ६७ हजार ७१८ मतदार आहेत. त्यापैकी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४७ हजार ३६१ मतदारांनी हक्क बजावला. सायंकाळी साडेपाचपर्यंत अंदाजे ८५ टक्के मतदान झाले. मतदानानंतर सीलबंद मशीन पोलीस बंदोबस्तात रात्री दहापर्यंत वाई येथील नवीन तहसील कार्यालयात ठेवण्यात आल्या. त्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी संवेदनशील गावांत मतदानाच्या दिवशी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. प्रसंगी एस.आर.पी. ग्रुपची तुकडीही मागविण्यात आली होती, तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर कोरोनासंबंधी आरोग्य विभागाकडून खरबरदारी घेण्यासाठी मशीनच्या साहाय्याने चाचणी करण्यात आली. मतदारांनी मास्क लावूनच मतदान केले.

चौकट :

संवेदनशील गावांत जास्त मतदान

वाई तालुक्यातील बावधनमध्ये ८० टक्के, केंजळ ८० टक्के, ओझर्डेत ८६ टक्के, पसरणीत ७७ टक्के यासह दहा गावांमध्ये ८१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले.