शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

७४ हजार ठेवीदारांचा विश्वास धोक्यात!

By admin | Updated: September 3, 2015 22:03 IST

‘वेट अँड वॉच’ : विलीनीकरणाची प्रक्रिया किचकटच; ठेवीदारांना दिलासा विलंबानेच मिळण्याची चिन्हे --‘जिजामाता’ची अर्थकोंडी : तीन

सातारा : जिजामाता बँकेतील कथित अनियमिततांच्या चौकशीत जे निष्पन्न व्हायचे ते होईलच; परंतु अन्य बँकेत ‘जिजामाता’चे विलीनीकरण करायचे म्हटले, तरी प्रदीर्घ प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनुसार ‘वेट अँड वॉच’ हीच भूमिका ठेवीदारांना स्वीकारावी लागणार आहे. जिजामाता सहकारी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध येताच ठेवी परत घेण्यासाठी ठेवीदारांची रीघ लागली. याचा दुहेरी परिणामझाला. एक तर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एक हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम कोणत्याही ठेवीदारास मिळत नसल्याने त्यांचा रक्तदाब वाढला. दुसरे म्हणजे, सर्वच ठेवीदार एकत्र जमल्याने ‘आमचे पैसे आम्हाला द्या,’ हा एकच नारा घुमला आणि पैसे परत देण्याच्या स्थितीत बँकेचे व्यवस्थापन नव्हते. बँकेचे हात रिझर्व्ह बँकेच्या नियमाने बांधले होते. पैसे आज मिळतील, उद्या मिळतील, असे ठेवीदारांना वाटत राहिले; मात्र तांत्रिकदृष्ट्या कुणाला पैसे मिळणे शक्यच नसल्याने ठेवीदारांचा पारा चढत राहिला. अखेर बँकेच्या शटरला अपेक्षेप्रमाणे कुलूप लागले.अडचणीतील बँका इतर बँकांमध्ये विलीन करून ठेवीदारांचे हितरक्षण करण्याचा शिरस्ता आहे. अर्थातच, जिजामाता बँकेचे अन्य बँकेत विलीनीकरण होईल आणि आपले पैसे परत मिळतील; किंबहुना ते मिळणार याची शाश्वती निर्माण होईल, हा पर्याय ठेवीदारांना सर्वप्रथम दिसू लागला. त्यामुळेच बँकेचे विलीनीकरण होणार का, झालेच तर कोणत्या बँकेत होणार, अशा चर्चा प्रथम रंगल्या.प्राप्त माहितीनुसार, कराड अर्बन बँकेने जिजामाता बँकेच्या विलीनीकरणासाठी अनुकूलता दर्शविली आहे. परंतु स्वत:चा लेखापरीक्षक नेमून बँकेच्या व्यवहारांचे बारकाईने निरीक्षण केले जाईल. हे ‘रिस्क मॅनेजमेन्ट’ तर कोणतीही संस्था करणारच. या लेखा परीक्षणातून विलीनीकरणास अनुकूल निष्कर्ष निघाल्यानंतर पुढील हालचालींना वेग येईल. जिजामाता बँकेच्या ठेवी आणि दिलेली कर्जे यांच्या रकमांवरून नजर टाकली असता बँकेची मालमत्ता वगळता कर्जे आणि सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक या दोहोंची बेरीज ११० कोटी होते, तर ठेवीदारांची देणी आहेत १०४ कोटी. म्हणजेच, सहा कोटी रुपये जमेच्या बाजूस अधिक दिसतात. परंतु याचा अर्थ बँकेची सर्व कर्जे लगेच वसूल होतील, असा घेता येत नाही. ही कर्जे कोणत्या स्वरूपाची आहेत, कोणाला दिली आहेत, किती कर्जदार नियमित परतफेड करीत आहेत, ज्यांच्याकडून वसुलीची शक्यता धूसर आहे असे कर्जदार किती, याचा विचार केल्यावरच ११० कोटी रुपयांचे वास्तव लक्षात येईल. त्यासाठीच लेखापरीक्षण करून घेणे गरजेचे वाटणार. त्यासाठी विलीनीकरणापूर्वीही लेखापरीक्षण होणारच. कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) जिजामाता बँकेचे फेरलेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे. हा निर्णय कोणत्याही क्षणी होऊ शकतो. हे फेरलेखापरीक्षण झाल्यास बँकेच्या कर्जदारांची पत आणि परतफेडीची क्षमता यावर प्रकाश पडणार आहे. त्यानंतरच आकड्यांचा खेळ फायद्याचा की तोट्याचा, हे ठरेल. ठेवीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता अधिक असली, तरी त्यांना ‘वेट अँड वॉच’ धोरण स्वीकारण्यावाचून तूर्त गत्यंतर नाही. (प्रतिनिधी)प्रश्न भावनिक गुंतवणुकीचा...साताऱ्यासारख्या छोट्या शहरात बँकेशी जोडलेला ग्राहक केवळ आर्थिक धाग्यांनी नव्हे, तर भावनिक धाग्यांनी जोडलेला असतो. ठेवीदारही बहुतांश वेळा संचालकांच्या ओळखीचे असतात. तोही ‘आपली बँक’ असा उल्लेख करीत असतो. अशा वेळी बँकेची अर्थकोंडी झाल्यास भावनिकदृष्ट्याही त्याचा भ्रमनिरास होत असतो. युनायटेड वेस्टर्न बँकेच्या विलीनीकरणावेळी बँकेशी जोडलेली प्रत्येक व्यक्ती हताश झाली होती. साताऱ्याचा वारसा नष्ट होत असल्याची भावना अनेकांची होती. जिजामाता बँकेशीही अनेकांची भावनिक गुंतवणूक असल्याने हा ‘क्रायसिस’ लवकर संपुष्टात यावा, अशी भावना व्यक्त होत आहे.