शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना बे्रक !

By admin | Updated: March 29, 2015 00:43 IST

सातारा जिल्हा : कोरेगाव, सातारारोड अन् वाई तालुक्यांतील किरोंडे गावात धुमशान सुरू

सातारा : जिल्ह्यातील मे ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकूण ७१४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने या कार्यक्रमात बदल केला असून, मे ते जुलै या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचीच निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील कोरेगाव, सातारारोड (ता. कोरेगाव) व किरोंडे (ता. वाई) या तीनच ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येणार आहे. दरम्यान, १६९ ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात कोणताही बदल झालेला नाही. सातारा जिल्ह्यातील ७१४ ग्रामपंचायतींपैकी मे ते जुलै २०१५ या कालावधीत कोरेगाव, सातारारोड व किरोंडे या तीन ग्रामपंचायतींची मुदत संपत असून, उर्वरित ७११ ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्ट ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत संपत आहे. त्यामुळे यापूर्वी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमातून जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायती वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ३० मार्चला संबंधित ठिकाणी नोटीस प्रसिद्ध केली जाईल. सार्वजनिक सुटीचा दिवस वगळून ३१ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दिले व स्वीकारले जातील. ८ एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज १० एप्रिलला दुपारी तीनपर्यंत मागे घेता येतील. त्याचदिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच त्यांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. २२ एप्रिलला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होईल. २३ एप्रिलला मतमोजणी होईल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसोबतच जिल्हा मध्यवर्ती बँक, किसन वीर व कृष्णा सहकारी साखर कारखाना या तीन संस्थांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ७११ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम रद्द झाल्याने शासकीय यंत्रणेवरील ताण निवळला आहे. तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आता केवळ ८५ कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे. (प्रतिनिधी)