शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना बे्रक !

By admin | Updated: March 29, 2015 00:43 IST

सातारा जिल्हा : कोरेगाव, सातारारोड अन् वाई तालुक्यांतील किरोंडे गावात धुमशान सुरू

सातारा : जिल्ह्यातील मे ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकूण ७१४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने या कार्यक्रमात बदल केला असून, मे ते जुलै या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचीच निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील कोरेगाव, सातारारोड (ता. कोरेगाव) व किरोंडे (ता. वाई) या तीनच ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येणार आहे. दरम्यान, १६९ ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात कोणताही बदल झालेला नाही. सातारा जिल्ह्यातील ७१४ ग्रामपंचायतींपैकी मे ते जुलै २०१५ या कालावधीत कोरेगाव, सातारारोड व किरोंडे या तीन ग्रामपंचायतींची मुदत संपत असून, उर्वरित ७११ ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्ट ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत संपत आहे. त्यामुळे यापूर्वी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमातून जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायती वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ३० मार्चला संबंधित ठिकाणी नोटीस प्रसिद्ध केली जाईल. सार्वजनिक सुटीचा दिवस वगळून ३१ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दिले व स्वीकारले जातील. ८ एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज १० एप्रिलला दुपारी तीनपर्यंत मागे घेता येतील. त्याचदिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच त्यांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. २२ एप्रिलला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होईल. २३ एप्रिलला मतमोजणी होईल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसोबतच जिल्हा मध्यवर्ती बँक, किसन वीर व कृष्णा सहकारी साखर कारखाना या तीन संस्थांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ७११ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम रद्द झाल्याने शासकीय यंत्रणेवरील ताण निवळला आहे. तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आता केवळ ८५ कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे. (प्रतिनिधी)