शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

जिल्ह्यातील ७० गावे अंधारात

By admin | Updated: June 25, 2015 01:01 IST

धुवाधार पाऊस : कास, बामणोली, तापोळा परिसरातील जनजीवन विस्कळीत; शनिवारपासून वीजपुरवठा खंडित

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा परिसरात वाऱ्यासह धुवाधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत पडणारा पाऊस आणि ठिकठिकाणी झाडे पडल्याने कास, बामणोलीसह कांदाटी खोऱ्यातील ७० हून अधिक गावे शनिवारपासून अंधारात आहेत. बुधवारी कास पुलावरून पाणी वाहू लागल्याने बामणोलीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे साताऱ्याशी असणारा त्या गावांचा संपर्क तुटला आहे. सातारा शहराच्या पश्चिम भागात कास, बामणोली, तापोळा परिसरातील दुर्गम भागात अनेक गावे वसली आहेत. या परिसरात नेहमीच पावसाची संततधार असते; पण यावर्षी जून महिन्यातच पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून पुन्हा धुवांधार पडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिसरातील अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. त्यामुळे विजेचे खांब वाकणे, तारा तुटणे, असे प्रकार घडले आहेत. परिणामी शनिवारपासून कास, बामणोली, तापोळा, कांदाटी खोऱ्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. संततधार पावसामुळे वीज सुरळीत करण्याचे प्रयत्न अपुरे पडू लागले आहेत. बामणोली, तापोळा भागातील लोकांना साताऱ्याला यायचे असेल, तर कास मार्गे यावे लागते; पण कास तलावाशेजारील पुलावरून सध्या चार-पाच फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कास तसेच बामणोली भागातील लोकांचा साताऱ्याशी संपर्क तुटलेला आहे. कास पुलावरील पाणी कमी झाल्यानंतरच पुन्हा संपर्क सुरू होणार आहे. सध्या कास पठार, बामणोली, तापोळा भागातील लोक पावसाच्या उघडिपीची वाट पाहत आहेत. (वार्ताहर)