शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

७० हजार हेक्टर शेती पंचनाम्याच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: September 19, 2015 23:51 IST

नुकसानभरपाई कधी ?: पावसासह सरकारचीही शेतकऱ्यांकडे पाठ

सातारा : खरीप पिकाच्या आधारावर दिवाळी साजरी करण्याचे बेत आखणाऱ्या शेतकऱ्यांना मुहूर्ताआधीच शिमगा करण्याची वेळ आली आहे. खरीप पिकांना ऐन वाढीच्या वेळेत पाणीच न मिळाल्याने या हंगामातील पिके कुचंबली, त्यामुळे उत्पादन घटण्याचे चिन्ह स्पष्टपणे दिसत असताना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप शासन पातळीवरुन झाले नसल्याने जिल्हा प्रशासनही हातावर हात धरुन बसले आहे. शेतकऱ्यांवर पावसासोबत सरकारही रुसल्याने त्यांना कोमात जाण्याची वेळ आली आहे. सातारा जिल्ह्यात खरीप हंगामातील सुमारे ४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. जून महिन्यातील पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे धाडस केले होते. पण जुलै, आॅगस्ट हे दोन्ही महिने कोरडे गेल्याने ऐन वाढीच्या वेळेत खरीप पिके कुचंबली आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात, कांदा, ऊस या पिकांसोबत बागायत पिके घेतली जातात. तर पूर्वेकडील फलटण, कोरेगाव, खटाव, माण या कमी पर्जन्यमान असणाऱ्या तालुक्यांमध्ये सोयाबीन, बाजरी, मका, मूग, मटकी, ज्वारी, घेवडा, भुईमूग या पिकांची पेरणी केली जाते. यंदाही जूनमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये चैतन्य पसरले होते. पूर्व भागात मात्र पाऊस पडला नसल्याने अनेक ठिकाणी खरीप पिकांची पेरणीच झाली नाही. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या तिथे विहिरी, कालव्यांच्या माध्यमातून पिकांना पाणी दिले; परंतु जिथे ही सोय नव्हती, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आभाळाकडे डोळे लावून बसावे लागले. जून महिन्यात पेरणी झाली. झालेल्या पावसाच्या आधारावर पिके काही प्रमाणात वाढली. पण जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यांमध्ये पावसाने पाठ फिरविल्याने वाढच्या अवस्थेत असणारी पिके करपून गेली. पिकांची उंचीही खुटली. त्यामुळे साहजिकच खरीप हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट होण्याची चिन्हे आहेत, शेतकरीच त्याला दुजोरा देत आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांना प्रचंड महागाईला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चालू महिन्यात परतीच्या पावसाने दिलासा दिला असल्याने माळरानावरील गवत वाढले आहे. हे गवत जनावरांसाठी उपयुक्त ठरत असले तरी पावसाळ्यानंतर तेही उपलब्ध होणार नसल्याने जिल्ह्यात प्रचंड चारा टंचाई जाणवणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ७0 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पीक अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) कर्जाचे जोखड खांद्यावर! खरीप पिकांच्या नुकसानीबाबत सरकारने गांभीर्याने घेतलेले नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होऊन बसली आहे. पेरणीसाठी पैसे घातले. बियाणे, खते, मजुरी यासाठी शेतकऱ्यांनी कर्जे काढली. आता ती फेडायची कशी? याचे प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांपुढे आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विकास सेवा सोसायटीची कर्जे उचलली आहेत. या पिकांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच शेतकरी हे कर्जे फेडत असतात. पण आता व्याजासकट पैसे फेडावे लागणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस जिल्ह्यातील शेतीसाठी वरदान ठरला असला तरी रब्बीच्या पेरणीसाठी कर्ज मिळविण्यासाठी पत कशी मिळवायची?, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. दिवाळीत सर्वसामान्यांचीही कंबर मोडणार खरीपातील उत्पादनाची घट दिवाळीच्या उत्सवावर परिणाम करणारी ठरणार आहे. रवा, बेसन, शेंगदाणे, सोयाबीन तेल यांच्या किंमती दिवाळीत भडकण्याची शक्यता आर्थिक तज्ञांचे मत आहे. या परिस्थितीत सर्वसामान्यांची कंबर दिवाळीत मोडणार, हे निश्चित मानले जात आहे.