शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
4
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
5
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
6
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
8
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
9
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
10
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
11
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
12
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
13
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
14
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
15
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
16
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
17
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
18
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
19
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
20
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!

७० हजार हेक्टर शेती पंचनाम्याच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: September 19, 2015 23:51 IST

नुकसानभरपाई कधी ?: पावसासह सरकारचीही शेतकऱ्यांकडे पाठ

सातारा : खरीप पिकाच्या आधारावर दिवाळी साजरी करण्याचे बेत आखणाऱ्या शेतकऱ्यांना मुहूर्ताआधीच शिमगा करण्याची वेळ आली आहे. खरीप पिकांना ऐन वाढीच्या वेळेत पाणीच न मिळाल्याने या हंगामातील पिके कुचंबली, त्यामुळे उत्पादन घटण्याचे चिन्ह स्पष्टपणे दिसत असताना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप शासन पातळीवरुन झाले नसल्याने जिल्हा प्रशासनही हातावर हात धरुन बसले आहे. शेतकऱ्यांवर पावसासोबत सरकारही रुसल्याने त्यांना कोमात जाण्याची वेळ आली आहे. सातारा जिल्ह्यात खरीप हंगामातील सुमारे ४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. जून महिन्यातील पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे धाडस केले होते. पण जुलै, आॅगस्ट हे दोन्ही महिने कोरडे गेल्याने ऐन वाढीच्या वेळेत खरीप पिके कुचंबली आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात, कांदा, ऊस या पिकांसोबत बागायत पिके घेतली जातात. तर पूर्वेकडील फलटण, कोरेगाव, खटाव, माण या कमी पर्जन्यमान असणाऱ्या तालुक्यांमध्ये सोयाबीन, बाजरी, मका, मूग, मटकी, ज्वारी, घेवडा, भुईमूग या पिकांची पेरणी केली जाते. यंदाही जूनमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये चैतन्य पसरले होते. पूर्व भागात मात्र पाऊस पडला नसल्याने अनेक ठिकाणी खरीप पिकांची पेरणीच झाली नाही. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या तिथे विहिरी, कालव्यांच्या माध्यमातून पिकांना पाणी दिले; परंतु जिथे ही सोय नव्हती, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आभाळाकडे डोळे लावून बसावे लागले. जून महिन्यात पेरणी झाली. झालेल्या पावसाच्या आधारावर पिके काही प्रमाणात वाढली. पण जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यांमध्ये पावसाने पाठ फिरविल्याने वाढच्या अवस्थेत असणारी पिके करपून गेली. पिकांची उंचीही खुटली. त्यामुळे साहजिकच खरीप हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट होण्याची चिन्हे आहेत, शेतकरीच त्याला दुजोरा देत आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांना प्रचंड महागाईला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चालू महिन्यात परतीच्या पावसाने दिलासा दिला असल्याने माळरानावरील गवत वाढले आहे. हे गवत जनावरांसाठी उपयुक्त ठरत असले तरी पावसाळ्यानंतर तेही उपलब्ध होणार नसल्याने जिल्ह्यात प्रचंड चारा टंचाई जाणवणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ७0 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पीक अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) कर्जाचे जोखड खांद्यावर! खरीप पिकांच्या नुकसानीबाबत सरकारने गांभीर्याने घेतलेले नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होऊन बसली आहे. पेरणीसाठी पैसे घातले. बियाणे, खते, मजुरी यासाठी शेतकऱ्यांनी कर्जे काढली. आता ती फेडायची कशी? याचे प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांपुढे आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विकास सेवा सोसायटीची कर्जे उचलली आहेत. या पिकांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच शेतकरी हे कर्जे फेडत असतात. पण आता व्याजासकट पैसे फेडावे लागणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस जिल्ह्यातील शेतीसाठी वरदान ठरला असला तरी रब्बीच्या पेरणीसाठी कर्ज मिळविण्यासाठी पत कशी मिळवायची?, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. दिवाळीत सर्वसामान्यांचीही कंबर मोडणार खरीपातील उत्पादनाची घट दिवाळीच्या उत्सवावर परिणाम करणारी ठरणार आहे. रवा, बेसन, शेंगदाणे, सोयाबीन तेल यांच्या किंमती दिवाळीत भडकण्याची शक्यता आर्थिक तज्ञांचे मत आहे. या परिस्थितीत सर्वसामान्यांची कंबर दिवाळीत मोडणार, हे निश्चित मानले जात आहे.