शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

७० हजार हेक्टर शेती पंचनाम्याच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: September 19, 2015 23:51 IST

नुकसानभरपाई कधी ?: पावसासह सरकारचीही शेतकऱ्यांकडे पाठ

सातारा : खरीप पिकाच्या आधारावर दिवाळी साजरी करण्याचे बेत आखणाऱ्या शेतकऱ्यांना मुहूर्ताआधीच शिमगा करण्याची वेळ आली आहे. खरीप पिकांना ऐन वाढीच्या वेळेत पाणीच न मिळाल्याने या हंगामातील पिके कुचंबली, त्यामुळे उत्पादन घटण्याचे चिन्ह स्पष्टपणे दिसत असताना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप शासन पातळीवरुन झाले नसल्याने जिल्हा प्रशासनही हातावर हात धरुन बसले आहे. शेतकऱ्यांवर पावसासोबत सरकारही रुसल्याने त्यांना कोमात जाण्याची वेळ आली आहे. सातारा जिल्ह्यात खरीप हंगामातील सुमारे ४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. जून महिन्यातील पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे धाडस केले होते. पण जुलै, आॅगस्ट हे दोन्ही महिने कोरडे गेल्याने ऐन वाढीच्या वेळेत खरीप पिके कुचंबली आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात, कांदा, ऊस या पिकांसोबत बागायत पिके घेतली जातात. तर पूर्वेकडील फलटण, कोरेगाव, खटाव, माण या कमी पर्जन्यमान असणाऱ्या तालुक्यांमध्ये सोयाबीन, बाजरी, मका, मूग, मटकी, ज्वारी, घेवडा, भुईमूग या पिकांची पेरणी केली जाते. यंदाही जूनमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये चैतन्य पसरले होते. पूर्व भागात मात्र पाऊस पडला नसल्याने अनेक ठिकाणी खरीप पिकांची पेरणीच झाली नाही. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या तिथे विहिरी, कालव्यांच्या माध्यमातून पिकांना पाणी दिले; परंतु जिथे ही सोय नव्हती, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आभाळाकडे डोळे लावून बसावे लागले. जून महिन्यात पेरणी झाली. झालेल्या पावसाच्या आधारावर पिके काही प्रमाणात वाढली. पण जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यांमध्ये पावसाने पाठ फिरविल्याने वाढच्या अवस्थेत असणारी पिके करपून गेली. पिकांची उंचीही खुटली. त्यामुळे साहजिकच खरीप हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट होण्याची चिन्हे आहेत, शेतकरीच त्याला दुजोरा देत आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांना प्रचंड महागाईला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चालू महिन्यात परतीच्या पावसाने दिलासा दिला असल्याने माळरानावरील गवत वाढले आहे. हे गवत जनावरांसाठी उपयुक्त ठरत असले तरी पावसाळ्यानंतर तेही उपलब्ध होणार नसल्याने जिल्ह्यात प्रचंड चारा टंचाई जाणवणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ७0 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पीक अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) कर्जाचे जोखड खांद्यावर! खरीप पिकांच्या नुकसानीबाबत सरकारने गांभीर्याने घेतलेले नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होऊन बसली आहे. पेरणीसाठी पैसे घातले. बियाणे, खते, मजुरी यासाठी शेतकऱ्यांनी कर्जे काढली. आता ती फेडायची कशी? याचे प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांपुढे आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विकास सेवा सोसायटीची कर्जे उचलली आहेत. या पिकांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच शेतकरी हे कर्जे फेडत असतात. पण आता व्याजासकट पैसे फेडावे लागणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस जिल्ह्यातील शेतीसाठी वरदान ठरला असला तरी रब्बीच्या पेरणीसाठी कर्ज मिळविण्यासाठी पत कशी मिळवायची?, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. दिवाळीत सर्वसामान्यांचीही कंबर मोडणार खरीपातील उत्पादनाची घट दिवाळीच्या उत्सवावर परिणाम करणारी ठरणार आहे. रवा, बेसन, शेंगदाणे, सोयाबीन तेल यांच्या किंमती दिवाळीत भडकण्याची शक्यता आर्थिक तज्ञांचे मत आहे. या परिस्थितीत सर्वसामान्यांची कंबर दिवाळीत मोडणार, हे निश्चित मानले जात आहे.