शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

कोयनेत ६३ टीएसमसी पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:41 IST

कोयनानगर : कोयना धरणातील कृष्णा पाणी वाटप लवादानुसार तांत्रिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना ३१ मार्चअखेर धरणात ६३ ...

कोयनानगर : कोयना धरणातील कृष्णा पाणी वाटप लवादानुसार तांत्रिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना ३१ मार्चअखेर धरणात ६३ टीएमसी इतके पाणी शिल्लक आहे. हे पाणी वीज निर्मिती व सिंचनासाठी पुरेसे आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता व्ही. एच. फाळके यांनी दिली.

महाराष्ट्राचे वरदायिनी ठरलेले कोयना धरण आहे. याच धरणावर राज्याची वीज आणि शेती पिण्याच्या पाण्याची गरज भागवत आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्याकडे संपूर्ण राज्याचे नेहमीच लक्ष असते.

कोयना धरणात १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. यातील पाण्यापासून सुमारे दोन हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील ६७.५० टीएमसी पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी तर उर्वरित पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. कृष्णा पाणी वाटप करारानुसार १ जून ते ३१ मे या कालावधीसाठी हा तांत्रिक पाणी करार असतो. यावर्षी कोयना पाणलोट क्षेत्रात जून महिन्यात दांडी मारलेल्या पावसाने जुलै, ऑगस्ट महिन्यात मुसळधार हजेरी लावली.

धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने धरण भरून वाहत होते. कोयना धरणाच्या एक जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक वर्षातील ३१ मार्चला दहा महिन्यांचा यशस्वी कार्यकाळ संपला आहे. ६७.५० टीएमसीपैकी ४६.९५ टीएमसी पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी झाला आहे. तब्बल २१.९५ टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी शिल्लक आहे.

पूर्वे व पश्चिमेला पाणी वाटप लवादानुसार तांत्रिक वर्षातील दहा महिने संपले आहे. तांत्रिक वर्ष संपायला अजून दोन महिने शिल्लक असताना ३१ मार्चअखेर कोयना धरणात ६३.०० टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वीजनिर्मिती व सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीटंचाई व भारनियमनाची चिंता मिटली आहे.

बुधवार, दि. ३१ मार्चअखेर धरणातून वीज निर्मितीसाठी पश्चिमेला ४६.९५ टीएमसी व पूर्वेला पायथा वीजगृहातून पूरजन्य स्थिती व सिंचनासाठी सोडलेल्या २६ टीएमसी पाण्याचा वापर करत कोयना जलविद्युत प्रकल्पातून २ हजार २६६.०६७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. आजवर ६.९४ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

चौकट

पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक विसर्ग

सध्या ताकारी, म्हैसाळ, टेंभू उपसा सिंचनासह कोयना, कृष्णा नदी शेजारील गावांना पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आजमितीस धरणातील शिल्लक पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरेसा आहे. मात्र, मे महिन्यातील वाढीव मागणी व मान्सूनची वेळेत सुरुवात महत्त्वाची आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता व्ही. एच. फाळके यांनी दिली.

दहा वर्षांत ३१ मार्चअखेर कोयना धरणातील शिल्लक पाणीसाठा

२११० : ७२.५९

२०११ : ६३.४४

२०१२ : ५७.३५

२०१३ : ५७.०५

२०१४ : ४२.४२

२०१५ : ६६.९०

२०१६ : ३८.७४

२०१७ : ४२.८८

२०१८ : ६६.०२

२०१९ : ६३.२२

२०२० : ६६.८३

२०२१ : ६५.००