शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

कोयनेत ६३ टीएसमसी पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:41 IST

कोयनानगर : कोयना धरणातील कृष्णा पाणी वाटप लवादानुसार तांत्रिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना ३१ मार्चअखेर धरणात ६३ ...

कोयनानगर : कोयना धरणातील कृष्णा पाणी वाटप लवादानुसार तांत्रिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना ३१ मार्चअखेर धरणात ६३ टीएमसी इतके पाणी शिल्लक आहे. हे पाणी वीज निर्मिती व सिंचनासाठी पुरेसे आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता व्ही. एच. फाळके यांनी दिली.

महाराष्ट्राचे वरदायिनी ठरलेले कोयना धरण आहे. याच धरणावर राज्याची वीज आणि शेती पिण्याच्या पाण्याची गरज भागवत आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्याकडे संपूर्ण राज्याचे नेहमीच लक्ष असते.

कोयना धरणात १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. यातील पाण्यापासून सुमारे दोन हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील ६७.५० टीएमसी पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी तर उर्वरित पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. कृष्णा पाणी वाटप करारानुसार १ जून ते ३१ मे या कालावधीसाठी हा तांत्रिक पाणी करार असतो. यावर्षी कोयना पाणलोट क्षेत्रात जून महिन्यात दांडी मारलेल्या पावसाने जुलै, ऑगस्ट महिन्यात मुसळधार हजेरी लावली.

धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने धरण भरून वाहत होते. कोयना धरणाच्या एक जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक वर्षातील ३१ मार्चला दहा महिन्यांचा यशस्वी कार्यकाळ संपला आहे. ६७.५० टीएमसीपैकी ४६.९५ टीएमसी पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी झाला आहे. तब्बल २१.९५ टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी शिल्लक आहे.

पूर्वे व पश्चिमेला पाणी वाटप लवादानुसार तांत्रिक वर्षातील दहा महिने संपले आहे. तांत्रिक वर्ष संपायला अजून दोन महिने शिल्लक असताना ३१ मार्चअखेर कोयना धरणात ६३.०० टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वीजनिर्मिती व सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीटंचाई व भारनियमनाची चिंता मिटली आहे.

बुधवार, दि. ३१ मार्चअखेर धरणातून वीज निर्मितीसाठी पश्चिमेला ४६.९५ टीएमसी व पूर्वेला पायथा वीजगृहातून पूरजन्य स्थिती व सिंचनासाठी सोडलेल्या २६ टीएमसी पाण्याचा वापर करत कोयना जलविद्युत प्रकल्पातून २ हजार २६६.०६७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. आजवर ६.९४ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

चौकट

पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक विसर्ग

सध्या ताकारी, म्हैसाळ, टेंभू उपसा सिंचनासह कोयना, कृष्णा नदी शेजारील गावांना पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आजमितीस धरणातील शिल्लक पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरेसा आहे. मात्र, मे महिन्यातील वाढीव मागणी व मान्सूनची वेळेत सुरुवात महत्त्वाची आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता व्ही. एच. फाळके यांनी दिली.

दहा वर्षांत ३१ मार्चअखेर कोयना धरणातील शिल्लक पाणीसाठा

२११० : ७२.५९

२०११ : ६३.४४

२०१२ : ५७.३५

२०१३ : ५७.०५

२०१४ : ४२.४२

२०१५ : ६६.९०

२०१६ : ३८.७४

२०१७ : ४२.८८

२०१८ : ६६.०२

२०१९ : ६३.२२

२०२० : ६६.८३

२०२१ : ६५.००