शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णाकाठची ८० टक्के मातीची घरे राहण्यास असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 13:54 IST

कृष्णा, कोयना नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या घरांचे मोठे नुकसान झाले; पण पुराचे पाणी घरात साचून राहिल्याने नदीकाठची सुमारे ८० टक्के घरे राहण्यास सुरक्षित नाहीत. गेल्या आठ दिवसांपासून सांगली जिल्ह्यात विविध जिल्ह्यांतील अभियंत्यांकडून सर्व्हे सुरू आहे. या सर्व्हेमध्ये घरे खिळखिळी होऊन ती राहण्यास योग्य नसल्याने या कुटुंबांचे स्थलांतर करण्यात यावे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

ठळक मुद्देकृष्णाकाठची ८० टक्के मातीची घरे राहण्यास असुरक्षितसांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील घरांना पुराचा फटका

दीपक शिंदे 

सातारा : कृष्णा, कोयना नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या घरांचे मोठे नुकसान झाले; पण पुराचे पाणी घरात साचून राहिल्याने नदीकाठची सुमारे ८० टक्के घरे राहण्यास सुरक्षित नाहीत. गेल्या आठ दिवसांपासून सांगली जिल्ह्यात विविध जिल्ह्यांतील अभियंत्यांकडून सर्व्हे सुरू आहे. या सर्व्हेमध्ये घरे खिळखिळी होऊन ती राहण्यास योग्य नसल्याने या कुटुंबांचे स्थलांतर करण्यात यावे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.गेल्या पंधरा दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. नदीकाठची पिके तर वाहून गेलीच; पण घरेही पडली. उरली सुरली आता एकामागून एक पडत आहेत. कृष्णा काठावर असलेली ही घरे काळ्या मातीत बांधली गेली आहेत. त्याला भक्कम असा आधार नसल्याने पावसाच्या पाण्याने ती खचली आहेत.

पाया खचल्याने आड्यासह घर जमिनीवर बसत आहे. जुने चौसोफा वाडे, दगडी बांधकाम, माती आणि जुन्या विटांची घरे खिळखिळी झाली आहेत. ती कधी पडतील, याचा काहीच नेम नाही. त्यामुळे या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे झाले आहे.नदीकाठच्या गावातील घरांमध्ये सात ते आठ दिवस पाणी होते. त्यामुळे या भिंती आता सिमेंटही सोडू लागल्या आहेत. दगडांच्या फटीमध्ये पाणी गेल्याने माती सुटून दगड मोकळे झाले आहेत. कधी घरातून अचानक बाहेरचा सूर्यप्रकाश दिसतो, अशी खिळखिळी अवस्था झाल्याचे सर्वेक्षण करणारे अभियंते सांगतात.

जुनी लोड बेअरिंगची घरे काही दिवस तग धरून राहतील; पण पुढील सहा महिन्यांत तीसुद्धा अंग टाकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गावात केवळ दहा टक्केच घरे आरसीसीची आहेत. तेवढी कशीतरी तग धरतील.सध्या तातडीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर रॅपिड फॉर्मच्या माध्यमातूनही सर्वेक्षण करून जीपीएस कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोटो घेतले जातील. वारंवार पुराची स्थिती उद्भवल्यामुळे या कुटुंबांचे कायमस्वरुपी स्थलांतर करावे का? असाही एक अहवाल तयार करण्यात येत आहे. त्याची आॅनलाईन नोंदणी करून लोकांची बाहेर जाऊन राहण्याची इच्छा आहे का? याबाबतही त्यांना विचारणा केली जाणार आहे. या सर्व्हेचा उपयोग सरकारला आपले धोरण ठरविण्यासाठी होणार आहे.

टॅग्स :Satara Floodसातारा पूरSatara areaसातारा परिसर