शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

म्हसवड बेकायदेशीर गौणखनिज उपसाप्रकरणी ४८ लाखांचा दंड!

By admin | Updated: June 28, 2016 00:35 IST

बाजारतळ काम : माणगंगा नदीतून मुरूम उचलल्याचा होता आरोप

दहीवडी : म्हसवड बाजारपटांगणाच्या काँक्रिटीकरणासाठी माणगंगा नदीतून बेकायदेशीर गौणखनिज वापर केल्यामुळे संबंधित ठेकेदाराला स्थानि क प्रशासनाकडून ४८ लाख ५२ हजार ३०० रुपये दंड ठोठावण्यात आला. येथील सिमेंट काँक्रिटीकरण कामासाठी ७५ लाख रुपये निधी उपलब्ध झाला होता. मात्र, ‘हे काम कागदोपत्री युनिक बिल्डर्स (माळेवाडी, अकलूज) यांच्या नावे नामधारी असून, ते काम प्रत्यक्षात आमदार समर्थक व माजी नगराध्यक्ष विजय धट हे करत आहेत. या कामासाठी लागणारी खडी, डबर वाळू व मुरूम हे गौणखनिज बेकायदेशीररीत्या माणगंगा नदीच्या पात्रातून रॉयल्टी न भरताच उचलले गेले आहे, ’अशी तक्रार ‘शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठान’चे सदस्य संग्राम शेटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसीलदार माण यांनी गावकामगार तलाठी म्हसवड यांना या कामाचा पंचनामा करून माणच्या तहसीलदार सुरेखा माने यांचेकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार तहसीलदार माने यांनी म्हसवड बाजारपटांगण काँक्रिटीकरणासाठी बेकायदेशीर गौणखनिज वापर केल्यामुळे ४८ लाख ५२ हजार ३०० रुपये दंडाची आकारणी केलीे.६५० ब्रास डबर, ८० ब्रास वाळू व मुरूम, १५० ब्रास खडी असे गौणखनिज रॉयल्टी न भरताच वापरले असल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.याबाबत काढलेल्या पत्रकात संग्राम शेटे म्हणाले की, ‘खंडणीखोर नेता कोण व खंडणीबहाद्दर भुरटे कार्यकर्ते कोण, हे माण-खटावच्या जनतेला आता चांगलेच माहीत झाले आहे. मौजे पळसावडे येथील एका पॉवर सोलर ऊर्जेच्या अधिकाऱ्यांकडून कोणाला खंडणी पाहिजे होती म्हणून काम बंद करायला लावले होते. कोणाचे भुरटे खंडणी बहाद्दर कार्यकर्ते कशासाठी टाटा पॉवरला खंडणी मागत होते?, हे सर्व माण-खटावच्या जनतेला माहीत आहे.मला कामाच्या दर्जाबाबत कळत नाही, असे म्हणणारे लोकप्रतिनिधी स्वत: इंजिनिअर आहेत का? माझे खुले आव्हान आहे की, त्यांनी शासनाच्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यामार्फत म्हसवडकर जनतेपुढे त्या कामाचा दर्जा, अंदाजपत्रकाप्रमाणे काम आहे का ते पाहावे आणि मग माझ्यावर खंडणीचे आरोप करावेत, असेही शेटे शेवटी म्हणाले. (प्रतिनिधी)गफला झाला नाही ; मग दंड कसा? : शेटे‘कामाच्या दर्जाबद्दल कदाचित आम्हाला कळत नसेल, परंतु रॉयल्टी न भरता चोऱ्या कोण करतंय व त्यांना पाठीशी कोण घालतंय हे जागरूक नागरिकाला समजले तरी पुरेसे आहे. बाजारपटांगण काँक्रिटीकरणाच्या कामात जर काही गफलाच झाला नव्हता तर ४८ लाख ५२ हजार ३०० रुपये दंडाची कारवाई कशी झाली. मी तक्रार करून खंडणी गोळा करतो हे आमदारांनी सिद्ध करून दाखवावे. मी केलेल्या तक्रारींमुळे तुमचे व कार्यकर्त्यांचे पितळ उघडे पडले म्हणून खंडणीचा आरोप केला जात आहे,’ असे संग्राम शेटे यांनी पत्रकात म्हटल आहे. २००९ पासूनचा सर्वच सात-बारा बाहेर काढू ...माण-खटावची जनता दूधखुळी राहिलेली नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण करावे, ‘कोंबडं झाकलं म्हणजे तांबडं फुटायचं राहत नाही,’ हे लक्षात ठेवावे. खंडणीचा आरोप करणाऱ्या लोकप्रतिनिधींना एवढेच सांगणे आहे की, २००९ पासूनचा सर्वच सात-बारा काढावा लागेल म्हणजे नवलेवाडी-रामोसवाडी सारखे आणखी किती रस्ते व इतर विकास कामे चोरीस गेली आहेत, हे कळेल, असा गर्भित इशाराही शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे संग्राम शेटे यांनी दिला आहे.