शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत ३६९ सिंचन विहिरींना मिळाली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:39 IST

सातारा : शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वत सोय व्हावी म्हणून, सिंचन विहिरी खोदण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत असून मागील ३ वर्षांत ...

सातारा : शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वत सोय व्हावी म्हणून, सिंचन विहिरी खोदण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत असून मागील ३ वर्षांत जिल्ह्यात ३६९ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. तर ७२ प्रस्तावांत त्रुटी निघाल्या आहेत. आता सिंचन विहीर मंजुरीचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना मिळाल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

शेतीसाठी पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक असते. त्यासाठी शेतकरी विहीर, बोअरवेल, कालव्यातून पाणी आणून शेती सिंचित करतो. मात्र, अनेक शेतकऱ्यांना हे शक्य होत नाही. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना सुरू आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत अशा विहिरींचे काम करण्यात येते. यासाठी ३ लाख रुपये अनुदान मिळते. यामधील ६० टक्के रक्कम ही मजुरीवर तर ४० टक्के बांधकाम साहित्यावर खर्च करायची असते. केंद्र शासन पूर्ण अनुदान देत असलेतरी अंमलबजावणीची जबाबदारी राज्य शासनावर आहे.

सिंचन विहिरीचा लाभ मिळण्यासाठी सलग ६० गुंठे क्षेत्र असणे आवश्यक असते. तसेच शेतकरी अल्पभूधारक (पाच एकरांच्या आतील) असावा. सिंचन विहीर घेण्यात येणाऱ्या जमिनीच्या गटात दुसरी विहीर नसावी, अशा अटी आहेत. तर शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून शेतकऱ्याने किमान ४० फूट खोल आणि ६ मीटर घेऱ्याची विहीर खोदणे आवश्यक असते.

सातारा जिल्ह्यात नोव्हेंबर २०१७ पासून आतापर्यंत विहिरींसाठी ४४१ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यामधील ७२ मध्ये त्रुटी निघाल्या. तर ३६९ विहिरींच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली. त्यामुळे बहुतांश सिंचन विहिरींची कामे सुरू झाली आहेत. तर काहींची पूर्णही झाली आहेत.

तालुकानिहाय प्रस्ताव

सातारा ८६

माण ५८

कोरेगाव ६७

कऱ्हाड ४३

पाटण ३३

फलटण ४८

वाई १७

महाबळेश्वर १३

खटाव ४१

.............

विहिरींसाठी आलेले एकूण प्रस्ताव

४४१

मंजूर झालेले प्रस्ताव

३६९

..................................

सातारा तालुक्यातून सर्वाधिक प्रस्ताव

दुष्काळीभागात कालवे कमी आहेत. त्यामुळे ७० टक्क्यांहून अधिक क्षेत्र हे विहिरीतील पाण्यावर भिजते. खऱ्या अर्थाने विहिरींची गरज ही दुष्काळी तालुक्यातच अधिक आहे. असे असलेतरी पर्जन्यमान चांगले राहणाऱ्या सातारा तालुक्यातून तीन वर्षांत सर्वात अधिक विहिरींचे प्रस्ताव आले आहेत. तर त्यानंतर कोरेगाव, माण, फलटण, खटाव या दुष्काळी तालुक्यांचा क्रमांक लागतो.

..................................................

विहिरींच्या अनुदानात वाढ

केंद्र शासनाची सिंचन विहीर योजना २०११ पासून सुरू आहे. सुरुवातीच्या काळात विहिरीसाठी २ लाख रुपये अनुदान देण्यात येत होते. मात्र, १७ डिसेंबर २०१२ च्या निर्णयानुसार ३ लाख रुपये अनुदान करण्यात आले आहे. तर विहिरीवरील मजुरांना २३८ रुपये मजुरी मिळते. मागील वर्षापासून मजुरीत वाढ करण्यात आलेली आहे.

...................................

कोट :

शेती करायची झाली तर पाणीव्यवस्था असणे आवश्यक ठरते. शासनाकडून विहिरीसाठी अनुदान देण्यात येते. तीन लाखांमध्ये विहिरीचे बऱ्यापैकी काम होते. आता विहीर मंजुरीचे प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडे आल्याने शेतकऱ्यांना लवकर लाभ मिळू शकतो.

- प्रल्हाद आटपाडकर, शेतकरी

........................................................................