शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जिल्ह्यातील ३५०० रिक्षाचालकांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली असली तरी हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली असली तरी हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांसाठी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. शासनाने रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली असून, जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार परवानाधारक रिक्षाचालकांना याचा लाभ होणार आहे.

गतवर्षी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. सर्वसामान्य नागरिकांना लॉकडाऊनची जशी झळ बसली तशीच रिक्षाचालक व हातावर पोट असणाऱ्या अनेकांना याचा मोठा फटका बसला. सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. हे करत असतानाच शासनाने गोरगरिबांच्या उदरनिर्वाहासासाठी देखील मदतीचा हात पुढे केला आहे.

जिल्ह्यातील परवानाधारक साडेतीन हजार रिक्षाचालकांच्या खात्यावर शासनाकडून प्रत्येकी दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. मात्र, ते पैसे कधी जमा होतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वाढत्या महागाईत ही रक्कम अपुरी असली तरी दिलासा देणारी आहे. त्यामुळे राज्य शासनाने रिक्षाचालकांप्रमाणे इतर वाहनधारकांचा देखील मदतीसाठी प्राधान्याने विचार करावा, अशी अपेक्षा रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.

(कोट)

राज्य शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. लॉकडाऊनच्या कालावधीत शासनाने मदतीची घोषणा केली आहे. मदतीची रक्कम जरी अत्यल्प असली तरी ती लवकरात लवकर खात्यावर वर्ग व्हावी.

- विक्रांत पवार, रिक्षाचालक.

(कोट)

संचारबंदीची सर्वाधिक झळ रिक्षाचालकांना बसली आहे. सध्या व्यवसाय पूर्णत: बंद आहे. त्यामुळे घर खर्च चालविणे जिकिरीचे बनले आहे. राज्य शासनाने निधीची घोषणा केल्याने दिलासा मिळाला आहे.

- सचिन गंगावणे, रिक्षाचालक.

(कोट)

राज्य शासनाने केवळ घोषणा केली असली तरी निधीची रक्कम प्रत्यक्षात खात्यावर कधी वर्ग होणार याबाबत साशंकता आहे. स्थानिक प्रशासनाने मदतीची रक्कम मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा.

- हरिदार यादव, रिक्षाचालक.

(पॉइंटर)

जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षाचालक ३५००.