शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

शिवसेना कार्यकर्त्यांवरील ३५० गुन्हे कायमच

By admin | Updated: June 12, 2015 00:46 IST

शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडूनही पुरेसे अधिकार दिले जात नाहीत, अशीही तक्रार करण्यात आली

सातारा : काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी शासनाने सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या आंदोलकांवर दाखल केलेल्या गुन्हे अद्याप कायम आहेत. चार महिन्यांपूर्वीच त्याबाबतचा शासन अद्यादेश निघूनही भाजपचे मंत्री जाणीवपूर्वक त्यामध्ये खोडा घालत असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. विकासकामांच्या बाबतीतही डावलले जात असल्याने शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे.शिवसेनेच्या आमदारांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडली होती. मंत्रालयातील सचिव तसेच अन्य अधिकारी तालुक्यांपर्यंतच्या कामांचे आदेश स्वत:च्या अधिकारात तसेच आमदारांना विश्वासात न घेता काढत आहेत. शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडूनही पुरेसे अधिकार दिले जात नाहीत, अशीही तक्रार करण्यात आली. दरम्यान, काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीचे शासन मागील दहा वर्षांच्या कालावधीत होते. तेव्हा शिवसैनिकांनी अनेक आंदोलने केली होती. त्यावेळच्या गुन्ह्यांमध्ये शिवसेना व भाजप या दोन पक्षांमध्ये फार मोठी तफावत होती. दहा वर्षांच्या कालावधीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सुमारे साडेचारशे गुन्हे दाखल झाले होते. चार महिन्यांपूर्वी आंदोलनात पाच लाखांच्या आतील नुकसानीचे गुन्हे काढून घेण्याबाबत शासन निर्णय झाला असूनही अद्याप साताऱ्यातील शिवसैनिकांवर दाखल असलेले गुन्हे काढून घेतले गेले नाहीत, अशी माहिती युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)युवा सेना जिल्हाध्यक्षांना तडीपारीची नोटीसयुवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांना १० जून रोजी तडीपारीची नोटीस प्राप्त झाली आहे. पूर्वीच्या ९ गुन्ह्यांच्या अनुषंगाने ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप शासन सत्तेत येऊनही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कोंडी सुरूच असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.