शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नवजाला ३४ मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात २० दिवसांपासून पावसाची उघडीप होती. पण, गुरुवारपासून तुरळक प्रमाणात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात २० दिवसांपासून पावसाची उघडीप होती. पण, गुरुवारपासून तुरळक प्रमाणात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत नवजाला सर्वाधिक ३४ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच कोयनेसह महाबळेश्वरलाही पावसाने हजेरी लावली. पूर्व भागात तुरळक पाऊस झाला.

जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर मुसळधार पाऊस झाला होता. विशेष करुन पश्चिम भागात धुवाधार पाऊस झालेला. यामुळे पश्चिमेकडील प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने वाढण्यास सुरुवात झाली होती. तर शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. असे असतानाच गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पश्चिमसह पूर्व भागातील खरीप हंगामातील पेरणी खोळंबलेली. धरणातही पाण्याची आवक कमी होत होती. पण, गुरुवारपासून पुन्हा जिल्ह्यात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १९ मिलिमीटर पाऊस झाला, तर जूनपासून कोयनानगरला ९५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला ३४ व आतापर्यंत ११४९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. तर महाबळेश्वरला १० आणि जूनपासून १२९९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४१.३५ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. तर १२३४ क्युसेक वेगाने पाणी आवक होत होती. धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद आहे.

दरम्यान, सातारा शहर व परिसरात बुधवारी आणि गुरुवारी पावसाने चांगली हजेरी लावली. पण, शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर पूर्व भागात काही ठिकाणी अल्प पाऊस झाला.