शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

येळीवमध्ये २५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST

औंध : येळीव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उद्योजक केशव जाधव यांच्या नेतृत्वाखालील हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने सर्वच सात जागा जिंकून माजी ...

औंध : येळीव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उद्योजक केशव जाधव यांच्या नेतृत्वाखालील हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने सर्वच सात जागा जिंकून माजी समाजकल्याण सभापती यांच्या २५ वर्षांच्या एकहाती सत्तेला सुरूंग लावत परिवर्तन घडविले.

खटाव तालुक्यातील येळीव ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जाते. तालुक्यातील जनतेचे निवडणुकीत लक्ष लागले होते. माजी समाजकल्याण सभापती यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनेल आणि उद्योजक केशव जाधव यांचे हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलमध्ये लढत झाली. प्रस्थापित नेत्याचे मोठे आव्हान समोर असताना केशव जाधव यांनी सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन सर्वच सातपैकी सात जागा जिंकून परिवर्तन घडवून आणले. जाधव यांनी विरोधकांना व्हाईटवाॅश दिल्याची तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे केशव जाधव, सुषमा घार्गे, रुक्मिणी जगताप, अलताफ शेख, शुभांगी जगताप, शामराव सर्वगोड, रेश्मा जाधव हे सदस्य निवडून आले आहेत.

या परिवर्तन पॅनेलच्या विजयासाठी दीपक घार्गे, प्रदीप घार्गे, बाबासो घार्गे, अरविंद घार्गे, संतोष जाधव, सचिन जाधव, अमोल घाडगे, विनोद चव्हाण, आबा चव्हाण, गोरख चव्हाण, शकर जाधव, चंद्रकांत चव्हाण, योगेश भोसले, अमर जगताप, आप्पासाहेब जगताप, दिनेश जगताप, दत्तात्रय जगताप, किरण जगताप, दीपक जगताप, नवनाथ जगताप, अर्जुन जगताप, विलास मोरे, नारायण जगताप, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

(प्रतिक्रिया)

येळीवचा विजय जनतेला समर्पित...

येळीवच्या जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून ग्रामपंचायतीच्या सर्व जागांवर आमच्या पॅनेलचे उमेदवार विजयी करून विश्वास दाखवला आहे. विकासकामाच्या माध्यमातून पुढील काळात लोकांचा विश्वास सार्थ ठरवीन.

-केशव जाधव

२०येळीव

फोटो:- येळीव (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी विजयाचा जल्लोष केला.