शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

टेंभूच्या पाण्यासाठी १६ गावे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:42 IST

मायणी : मायणी परिसरातील १६ गावांना शेतीसाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे, यासाठी १६ गावांतील ग्रामस्थ आक्रमक झाले ...

मायणी : मायणी परिसरातील १६ गावांना शेतीसाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे, यासाठी १६ गावांतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. या प्रश्नाबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यासाठी पत्र तयार केले असून, लवकरच ग्रामस्थांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

सांगली जिल्ह्यातून टेंभू उपसा योजनेचे पाणी सोलापूर जिल्ह्याला जात आहे. दुष्काळी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कलेढोण गावापासून या योजनेचे पाणी जात असूनही, या भागाला आजपर्यंत या पाण्याचा लाभ कधी मिळाला नाही. याठिकाणी हजारो एकर कोरडवाहू शेती आहे. येथील शेतकरी कमी पाण्यावर येणारी व नगदी पिके घेतात. मात्र सततच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हातातोंडाला आलेले पीकही अनेकदा वाया जाते. कमी पाण्यावर व माळरानावर येणारे पीक म्हणून प्रारंभी या भागातील शेतकरी द्राक्ष बागांकडे वळले.

आयुष्यभर कमावलेला पैसा बागेसाठी खर्च केला. त्यातून उदरनिर्वाह व परिसरातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी प्रसंगी विकत पाणी घेऊन येथील शेतकरी द्राक्ष बागा जगवत आहेत.

सध्या मोठ्या प्रमाणात द्राक्षे या भागातून निर्यात होत आहेत. मात्र, गेल्या दोन दशकांपासून या भागातील शेतकरी, ग्रामस्थ टेंभू योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. या परिसरात पाण्यासाठी अनेक लहान-मोठी आंदोलने झाली; परंतु शासन दरबारी म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे या भागातील कलेढोण, मुळीकवाडी, पाचवड, तरसवाडी, गारुडी, गारळेवाडी, हिवरवाडी, तरसवाडी, ढोकळवाडी, कान्हरवाडी, कानकात्रे, अनफळे पडळ, औतरवाडी, कठरेवाडी या ग्रामपंचायतींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यासाठी लेखी पत्र तयार केले असून, लवकरच ही पत्रे घेऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ अजित पवार भेट घेणार आहे.

चौकट

टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे, यासाठी या भागातील ग्रामस्थांनी राजकारणविरहित लढा उभारला आहे. त्यामुळे या लढ्याचे सर्वसामान्य ग्रामस्थही नेतृत्व करत आहे. शासनाने याबाबत योग्य व सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे, तरच या भागाचा विकास होईल.