शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मुख्य धरणे भरण्यासाठी १६ टीएमसी पाण्याची आवश्यकता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST

सातारा : जिल्ह्यात जुलै महिन्यात धुवाँधार पाऊस झाल्यानंतर धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. पण, गेल्या दीड महिन्यात तुरळक प्रमाणात ...

सातारा : जिल्ह्यात जुलै महिन्यात धुवाँधार पाऊस झाल्यानंतर धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. पण, गेल्या दीड महिन्यात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. तसेच सध्या पावसाची उघडीप आहे. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख सहा धरणे भरण्यासाठी अजूनही १६ टीएमसीवर पाण्याची आवश्यकता आहे. सध्या या धरणांत १३२ टीएमसी पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे सर्व धरणे ओव्हर फ्लो होतात. तसेच पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अनेकवेळा धरणातून पाणी सोडावे लागल्याने नदीकाठच्या गावांना धोकाही निर्माण झालेला. दोन वर्षांपूर्वी तर कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा नद्या पात्र सोडून वाहात होत्या. त्यामुळे आजुबाजुच्या गावात आणि शेतात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते. गेल्या वर्षीही धरणे वेळेत भरली होती. यावर्षी मात्र, धरणे भरण्यास उशिर झालेला आहे. आताही पावसाळा सुरू होऊन तीन महिने होऊन गेले आहेत. पावसाळा संपण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.

जुलै महिन्यात पश्चिम भागात तीन दिवस धुवाँधार पाऊस कोसळत होता. यामुळे शेती, पिके, रस्ते, घरे यांचे मोठे नुकसान झाले. तसेच या अतिवृष्टीमुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयनासारख्या धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाणी आलेले. तसेच इतर धरणांतही पाणीसाठा वाढलेला. त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरु करावा लागला. सध्या पावसाची उघडीप आहे. त्यामुळे धरणांत मागील वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या ६ प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षी यावेळी या धरणात १४४.८३ टीएमसी पाणीसाठा होता. तर यावर्षी तो १३२ टीएमसी इतका आहे. त्यामुळे धरणांत पाणीसाठा मोठ्या प्रमाणात टिकून असला तरी ती भरणे महत्त्वाचे आहे. १०५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात ९३ टीएमसीवर पाणीसाठा आहे. हे धरण भरण्यासाठी अजून ११ टीएमसीच्या वर पाणी आवक आवश्यक आहे. सध्या पावसाची उघडीप कमी आहे, तर धरणात आवक अत्यल्प आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी मोठ्या पावसाचीच आवश्यकता आहे. इतर धरणे भरण्यासाठी चांगला पाऊस आवश्यक आहे.

चौकट :

पूर्व भागातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा...

जिल्ह्यातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात साठा आहे. ही धरणे भरली नसली तरी चिंता करण्यासारखी स्थिती नाही. याला कारण म्हणजे पावसाने लावलेली चांगली हजेरी. पण, पूर्व माण, खटाव या तालुक्यातील तलाव, ओढे, बंधारे, कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकरीही आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यातच आता खरीप हंगामातील पिकेही चांगली आली आहेत. या पिकांसाठी पाऊस आवश्यक आहे.